मुंबई

वरळीतील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

वरळीच्या लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिविसर्जन करताना दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार आणि पोलिसानी तत्काळ तिघांचा शोध सुरू केला.

Swapnil S

मुंबई : वरळीच्या लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिविसर्जन करताना दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमार आणि पोलिसानी तत्काळ तिघांचा शोध सुरू केला. संतोष विश्वेश्वर (५१), कुणाल कोकाटे (४५) अशी मृतांची नावे आहेत. संजय सरवणकर हे जखमी झाले. वरळी येथील लोटस जेट्टी येथे शनिवारी अस्थिविसर्जनाचा विधी सुरू असताना लाटांच्या प्रवाहासोबत तिघेजण वाहून गेले.

यावेळी लोकांनी आरडाओरड केल्यानंतर सायंकाळी ५.४० वाजता समुद्रात तीन जण बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तिघांना पाण्यातून बाहेर काढले. तिघांनाही नायर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर जखमीची प्रकृती आता स्थिर आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’