राष्ट्रीय

पाऊस, पुरात ९ वर्षांत १७ हजार जणांचा बळी

नैसर्गिक आपत्तीत पिके, घर, सार्वजनिक सुविधांचे २,७६,००४.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : २०१२ ते २०२१ दरम्यान पूर व मुसळधार पावसाने देशात १७ हजार जणांचा बळी गेल्याचे केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी सांगितले की, अल्पावधीत जास्त पाऊस पडल्याच्या घटना वाढत असल्याने शहरी भागात पुराचे प्रमाण वाढत आहे. बेसुमार वाढ, पाण्याच्या साठ्यांवर अतिक्रमणे, पाणी वाहून नेण्यासाठीची खराब व्यवस्था यामुळे पाणी साचत आहे.

तुडू यांनी सांगितले की, २०१२ ते २०२१ दरम्यान पाऊस व पुरात १७४२२ जणांचा बळी गेला आहे. पूर व मुसळधार पावसामुळे शहर व ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत पिके, घर, सार्वजनिक सुविधांचे २,७६,००४.०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, तर शहरी पूरग्रस्त भागात अनेक नैसर्गिक उपाय केले आहेत. सरकारने जमिनीतील भूजल पुनर्भरणासाठी मास्टर प्लॅन बनवला आहे. त्यासाठी १.४२ कोटी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प उभारले आहेत. त्यातून १८५ अब्ज क्युबिक मीटर पाणी साठवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद

दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी! केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ

कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत; १२ ऑपरेशन थिएटर, ३ हजारपेक्षा अधिक बेड्स, फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन