राष्ट्रीय

स्मार्टफोन पार्ट्सवर आयात शुल्कात कपात करू नका; जीटीआरआयचे सरकारला साकडे

भारतीय उत्पादकांनी भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सवर ‘शुल्क भरणे’ आवश्यक आहे

Swapnil S

नवी दिल्ली : सरकारने आगामी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये स्मार्टफोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पार्ट्सवर आयात शुल्क कमी करू नये. कारण सध्याची दररचना आधीच योग्य ठरली आहे. आता त्यात बदल झाल्यास देशांतर्गत उत्पादनास धोकादायक ठरू शकते, असे जीटीआरआयच्या अहवालात सोमवारी म्हटले आहे.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय)ने म्हटले आहे की, सध्याचे दर कायम ठेवल्याने भारताच्या वाढत्या स्मार्टफोन बाजारामध्ये उद्योगाची वाढ आणि दीर्घकालीन विकास समतोल राखण्यास मदत होईल. सध्या, भारतात स्मार्टफोनच्या आयात केलेल्या भागांवर ७.५ टक्के ते १० टक्के दर आहेत. लेखानुदानात हे कर कायम ठेवले पाहिजेत. लेखानुदानात स्मार्टफोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात करू नये, असे त्यात म्हटले आहे. कराचा सध्याचा दर निर्यातीसाठी उत्पादने बनवण्यासाठी शुल्कमुक्त आयातीला समर्थन देतो.

१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. ही सूचना उद्योग संस्था इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (आयसीईए) च्या मागणीच्या विरुद्ध आहे की, मोबाइल फोन पार्ट्सवरील आयात शुल्क कपातीमुळे हँडसेटचे देशांतर्गत उत्पादन २८ टक्क्यांनी वाढून ८२ अब्ज डॉलर्स होऊ शकते, निर्यातीला चालना मिळू शकते आणि स्वदेशी उत्पादनास समर्थन मिळू शकते. थिंक टँकने म्हटले आहे की, भारतीय उत्पादकांनी भारतात विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्सवर ‘शुल्क भरणे’ आवश्यक आहे, परंतु निर्यातीला अशा शुल्कातून सूट दिली पाहिजे.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी घोषणा; १ वर्षापर्यंत प्रसूती रजेसह 'लवकर या आणि लवकर जा' ची सुविधा

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

कुवेतमध्ये अडकलेला लेक मायदेशी परतला; अभिनेत्री विशाखा सुभेदार भावूक, "१० दिवसांनी मुलाला पाहिलं…"