राष्ट्रीय

चार बालमजुर कामगारांची सुटका

या चारही मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले

नवशक्ती Web Desk

दोन वेगवेगळ्या कारवाईत चार बालमजुर कामगारांची शिवाजीनगर आणि आरएके मार्ग पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी सलीम जब्बार खान आणि मेहताब रहिमतअली खान या दोन मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गोवंडी आणि शिवडीत टोपी बनविण्याच्या कारखान्यासह एका कॅटरर्स कार्यालयात ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील एका टोपी कारखान्यात शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकून तीन अल्पवयीन मुलांची सुटका केली. दुसऱ्या कारवाईत मेहताब खान याच्याकडे कॅटरर्ससाठी काही अल्पवयीन मुले काम करत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तिथे छापा टाकून एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले. या चारही मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जयपूर आंदोलनात मारहाण; Video व्हायरल, घटनेनंतर दिपके यांची पोस्ट चर्चेत

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत