राष्ट्रीय

चार बालमजुर कामगारांची सुटका

नवशक्ती Web Desk

दोन वेगवेगळ्या कारवाईत चार बालमजुर कामगारांची शिवाजीनगर आणि आरएके मार्ग पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी सलीम जब्बार खान आणि मेहताब रहिमतअली खान या दोन मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गोवंडी आणि शिवडीत टोपी बनविण्याच्या कारखान्यासह एका कॅटरर्स कार्यालयात ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील एका टोपी कारखान्यात शिवाजीनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकून तीन अल्पवयीन मुलांची सुटका केली. दुसऱ्या कारवाईत मेहताब खान याच्याकडे कॅटरर्ससाठी काही अल्पवयीन मुले काम करत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तिथे छापा टाकून एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले. या चारही मुलांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस