राष्ट्रीय

मणिपूर, नागालँड, अरुणाचलमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला

केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँडमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँडमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने मणिपूरमधील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम, १९५८ च्या कलम तीननुसार ‘आफ्सा’ वाढवण्याचा निर्णय घेतला. मणिपूरच्या ५ जिल्ह्यांतील १३ पोलीस ठाण्यातील अधिकार क्षेत्र सोडून सर्व मणिपूरमध्ये १ एप्रिल २०२५ पासून पुढील सहा महिने अशांत घोषित करण्यात आले आहेत. अरुणाचलच्या तिरप, चांगलांग आणि लाँगडिंग आणि राज्यातील तीन पोलीस ठाणे क्षेत्रात ‘आफ्सा’ सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.

मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात ‘आफ्सा’ १९५८, १९७२ पासून लागू आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून BMC निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती; इक्बाल सिंग चहल यांच्यावर मोठी जबाबदारी

BMC Election 2026 : भाजपकडून १३६ उमेदवार निश्चित; कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार, वाचा सविस्तर

धावत्या व्हॅनमध्ये तरुणीवर गँगरेप; लिफ्टच्या बहाण्याने गाडीत बसवलं अन्...

३१ डिसेंबरची हाऊस पार्टी फ्लॉप? 'या' होम डिलिव्हरी ॲप्सचे कामगार संपावर; तुमच्या शहरात डिलिव्हरी चालू की बंद? जाणून घ्या सविस्तर

संभाजीनगर महापालिकेत महायुती तुटली; शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे वातावरण