राष्ट्रीय

मणिपूर, नागालँड, अरुणाचलमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला

केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँडमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँडमध्ये ‘आफ्सा’ सहा महिन्यांनी वाढवला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने मणिपूरमधील कायदा व सुव्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर सशस्त्र दल विशेष अधिकार अधिनियम, १९५८ च्या कलम तीननुसार ‘आफ्सा’ वाढवण्याचा निर्णय घेतला. मणिपूरच्या ५ जिल्ह्यांतील १३ पोलीस ठाण्यातील अधिकार क्षेत्र सोडून सर्व मणिपूरमध्ये १ एप्रिल २०२५ पासून पुढील सहा महिने अशांत घोषित करण्यात आले आहेत. अरुणाचलच्या तिरप, चांगलांग आणि लाँगडिंग आणि राज्यातील तीन पोलीस ठाणे क्षेत्रात ‘आफ्सा’ सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.

मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात ‘आफ्सा’ १९५८, १९७२ पासून लागू आहे.

Mumbai : सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकला मुदतवाढ; अनेक मेल/एक्स्प्रेस गाड्या १३ जूनपर्यंत दादर व ठाणे स्थानकापर्यंतच

पुण्यातील ऐतिहासिक सारसबाग दोन दिवस बंद; पोलीस आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय

'बायजूज' संस्थापकाला तुरुंगवासाची शिक्षा; सिंगापूर न्यायालयाचा आदेश प्रक्रियात्मक असल्याचा रवींद्रन यांचा दावा

Himachal Pradesh : सिमल्यात ७२ तासांत ७० हजार वाहनांची एन्ट्री

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ११५० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, ३ परदेशी नागरिकांना अटक