राष्ट्रीय

भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी अमेठीत

राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काकवामध्ये राहुल गांधींचे सर्वप्रथम स्वागत केले जाईल.

Swapnil S

अमेठी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास अमेठीत दाखल होईल, असे पक्षाच्या जिल्हा युनिटच्या पदाधिकाऱ्याने रविवारी सांगितले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा याही राहुल यांच्यासोबत अमेठीत येतील, असे पक्षाने सांगितले.

राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काकवामध्ये राहुल गांधींचे सर्वप्रथम स्वागत केले जाईल. त्यांची न्याय यात्रा प्रतापगढ जिल्ह्यातील रामपूर खास विधानसभा मतदारसंघातून अमेठी सीमेवर दाखल होईल, असे काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक