राष्ट्रीय

सायरस मिस्त्री यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका

वृत्तसंस्था

सायरस मिस्त्री यांना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला. खरेतर, सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून हटवण्याच्या २०२१ च्या निर्णयाचे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करण्याची मागणी करणारी एसपी ग्रुपची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. टाटा समूहासोबतच्या वादाच्या संदर्भात ही पुनर्विलोकन याचिका न्यायाधीशांनी फेटाळून लावली.

टाटा-मिस्त्री वादाच्या बाबतीत, न्यायालयाने आपल्या मार्च २०२१च्या निकालात सायरस मिस्त्री यांच्या विरोधात केलेल्या काही टिप्पण्या काढून टाकण्याचे आदेश दिले. पुनर्विलोकन याचिकेत कोणतेही कारण सापडले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यावर चेंबरमध्ये विचार केला, तरीही न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांनी अल्पमतातील निकालात पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली. २६ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देताना सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या प्रमुख पदावरून हटवण्याचा निर्णय कायम ठेवला.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल