राष्ट्रीय

कोलकात्यातील परकियांचे पुतळे काढणार भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान : इंडियाचे नाव भारतच करणार

जगभरातील नेते भारतात हजर असल्यामुळे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे

नवशक्ती Web Desk

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते दिलीप घोष यांनी इंडियाचे नामकरण भारत असेच करण्यात येणार आहे. तसेच कोलकाता शहरातील परकियांचे पुतळे देखील काढून टाकण्यात येतील. ज्यांना या नावाला विरोध आहे ते देश सोडू शकतात, असे आक्रमक विधान करून या नावाला विरोध करणाऱ्यांना जणू आव्हानच दिले आहे.

दिलीप घोष हे मेदिनापूर येथील भाजपचे खासदार आहेत. ते खरगपूर येथे चाय पे चर्चा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आमचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही कोलकातामधील परकियांचे सर्व पुतळे काढून टाकणार आहोत. तसेच प. बंगालमधील आणखी एक भाजप नेते राहुल सिन्हा यांनी एका देशाची दोन नावे असूच शकत नाहीत. आता जगभरातील नेते भारतात हजर असल्यामुळे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. भाजप नेत्यांच्या या आव्हानाला उत्तर देताना तृणमूल काँग्रेस प्रवक्ता शांतनू सेन यांनी भाजप इंडिया आघाडीला घाबरली असून खऱ्या मुद्यांवरून जनतेचे लक्ष भ्रमित करण्यासाठी यांनी भारत नावाचा नवा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप केला आहे.

Navi Mumbai : भाज्यांची दरवाढ; उन्हाचा तडाखा, इंधन दरवाढीचा फटका

जिल्हा बँकांना ‘सायबर सिक्युरिटी’ बंधनकारक; सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांचे आदेश

Pune : माऊलींच्या मंदिराची सुरक्षा AI कडे; मंदिर संस्थान कमिटीची घोषणा

नाशिक टीसीएस प्रकरण : मतीन पटेलसह घरमालकाची चौकशी; SIT कडून मोबाईल जप्त, गरज पडल्यास पुन्हा चौकशी

जळगावची जागा द्या, अन्यथा मैत्रीपूर्ण लढू द्या; गुलाबराव पाटलांच्या पुत्रासाठी शिंदे गट आक्रमक