राष्ट्रीय

कोलकात्यातील परकियांचे पुतळे काढणार भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान : इंडियाचे नाव भारतच करणार

जगभरातील नेते भारतात हजर असल्यामुळे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे

नवशक्ती Web Desk

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते दिलीप घोष यांनी इंडियाचे नामकरण भारत असेच करण्यात येणार आहे. तसेच कोलकाता शहरातील परकियांचे पुतळे देखील काढून टाकण्यात येतील. ज्यांना या नावाला विरोध आहे ते देश सोडू शकतात, असे आक्रमक विधान करून या नावाला विरोध करणाऱ्यांना जणू आव्हानच दिले आहे.

दिलीप घोष हे मेदिनापूर येथील भाजपचे खासदार आहेत. ते खरगपूर येथे चाय पे चर्चा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आमचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही कोलकातामधील परकियांचे सर्व पुतळे काढून टाकणार आहोत. तसेच प. बंगालमधील आणखी एक भाजप नेते राहुल सिन्हा यांनी एका देशाची दोन नावे असूच शकत नाहीत. आता जगभरातील नेते भारतात हजर असल्यामुळे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. भाजप नेत्यांच्या या आव्हानाला उत्तर देताना तृणमूल काँग्रेस प्रवक्ता शांतनू सेन यांनी भाजप इंडिया आघाडीला घाबरली असून खऱ्या मुद्यांवरून जनतेचे लक्ष भ्रमित करण्यासाठी यांनी भारत नावाचा नवा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप केला आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन