राष्ट्रीय

कोलकात्यातील परकियांचे पुतळे काढणार भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान : इंडियाचे नाव भारतच करणार

जगभरातील नेते भारतात हजर असल्यामुळे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे

नवशक्ती Web Desk

कोलकाता : पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते दिलीप घोष यांनी इंडियाचे नामकरण भारत असेच करण्यात येणार आहे. तसेच कोलकाता शहरातील परकियांचे पुतळे देखील काढून टाकण्यात येतील. ज्यांना या नावाला विरोध आहे ते देश सोडू शकतात, असे आक्रमक विधान करून या नावाला विरोध करणाऱ्यांना जणू आव्हानच दिले आहे.

दिलीप घोष हे मेदिनापूर येथील भाजपचे खासदार आहेत. ते खरगपूर येथे चाय पे चर्चा कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आमचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही कोलकातामधील परकियांचे सर्व पुतळे काढून टाकणार आहोत. तसेच प. बंगालमधील आणखी एक भाजप नेते राहुल सिन्हा यांनी एका देशाची दोन नावे असूच शकत नाहीत. आता जगभरातील नेते भारतात हजर असल्यामुळे नाव बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. भाजप नेत्यांच्या या आव्हानाला उत्तर देताना तृणमूल काँग्रेस प्रवक्ता शांतनू सेन यांनी भाजप इंडिया आघाडीला घाबरली असून खऱ्या मुद्यांवरून जनतेचे लक्ष भ्रमित करण्यासाठी यांनी भारत नावाचा नवा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप केला आहे.

हायवेवर फूड कोर्ट, पेट्रोल पंप किंवा जोडरस्ता हवाय? सर्व NOC आता एकाच क्लिकवर; सुधारित Rajmarg Pravesh पोर्टल लाँच

देशात 'ई-२०' इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

Mumbai : सरकारने थकवले शिक्षण विभागाचे अनुदान; ७२४१.३८ कोटी रुपये मिळविण्यासाठी BMC चा पाठपुरावा सुरूच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

T20 World Cup 2026: आज चुकीला माफी नाही! भारताला झिम्बाब्वेविरुद्ध विजय अनिवार्य