(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

वायनाड मदत पॅकेजचे अनुदानात रूपांतर करा! प्रियांका यांची मोदींना पत्राद्वारे विनंती

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वायनाड भूस्खलन दुर्घटनेसाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजचे अनुदानात रूपांतर करण्याची आणि त्याच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्याची विनंती केली.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वायनाड भूस्खलन दुर्घटनेसाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजचे अनुदानात रूपांतर करण्याची आणि त्याच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्याची विनंती केली.

प्रियांका गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, ५२९.५० कोटी रुपयांचे मदत पॅकेज पुरेसे नाही. या दुर्घटनेला 'राष्ट्रीय आपत्ती' म्हणून घोषित न केल्यामुळे तेथील लोक निराश झाले आहेत. ३० जुलै २०२४ रोजी वायनाडमधील मुंडक्काई आणि चूरलामला भागात भूस्खलनात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. इतर अनेक जण जखमी झाले. या आपत्तीने हे दोन्ही क्षेत्र जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले, असे त्या म्हणाल्या.

मदतीची रक्कम कर्ज म्हणून वितरीत

तेथील लोकांचे जीवन आणि उपजीविका उद्ध्वस्त होऊन सहा महिने उलटले आहेत. त्यांचे जीवन पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात त्यांना अजूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे हे खरोखरच हृदयद्रावक आहे. या पॅकेजमध्ये दोन अटी आहेत. पहिली अट अशी आहे की, वितरीत केली जाणारी रक्कम अनुदान म्हणून दिली जाणार नाही, तर कर्ज म्हणून दिली जाईल. दुसरी अट अशी आहे की ही रक्कम ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्णपणे खर्च करावी लागेल. ते बदलण्याची विनंती वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वढेरा यांनी केली आहे.

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?