राष्ट्रीय

आगीत दाम्पत्यासह तीन मुलांचा जळून मृत्यू

पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तेथे पाच जळालेले मृतदेह मिळाले.

Swapnil S

बरेली : फरीदपूर येथे शनिवारी रात्री एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. बरेलीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात हे कुटुंब भाड्याच्या घरात राहात होते. रविवारी सकाळी घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तेथे पाच जळालेले मृतदेह मिळाले. अजय गुप्ता (३८), त्यांची पत्नी अनिता (३६), मुले दिव्यांश (९), दक्ष (३) आणि मुलगी दिव्यांका (६) अशी त्यांची नावे आहेत. आग कशी लागली, याचा शोध चालू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून अंत्यसंस्काराचा सर्व खर्च सरकार करणार आहे, असे जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले.

इराणच्या राजधानीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; आणीबाणी जाहीर, भारतीय नागरिकांना दूतावासाचा इशारा

"तो भारदस्त आवाज पुन्हा…"; अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबीयांच्या भावनिक पोस्ट

होळीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवा उद्यापासून सुरू; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा