राष्ट्रीय

आगीत दाम्पत्यासह तीन मुलांचा जळून मृत्यू

पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तेथे पाच जळालेले मृतदेह मिळाले.

Swapnil S

बरेली : फरीदपूर येथे शनिवारी रात्री एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. बरेलीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात हे कुटुंब भाड्याच्या घरात राहात होते. रविवारी सकाळी घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तेथे पाच जळालेले मृतदेह मिळाले. अजय गुप्ता (३८), त्यांची पत्नी अनिता (३६), मुले दिव्यांश (९), दक्ष (३) आणि मुलगी दिव्यांका (६) अशी त्यांची नावे आहेत. आग कशी लागली, याचा शोध चालू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून अंत्यसंस्काराचा सर्व खर्च सरकार करणार आहे, असे जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले.

माघार नाहीच; UPI शुल्काबाबत सरकार ठाम, व्यापारी नाराज; रोखीचे व्यवहार वाढण्याची भीती

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

Maratha Reservation : मनोज जरांगे आज दुपारी मुंबईकडे निघणार

आमदारांचे बहुमत ही कसोटी पुरेशी आहे? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

भाजप आमदार मेहतांची 'शरणागती'; भाईंदरमधील जमीन करावी लागली परत, पंतप्रधानांच्या भेटीनंतर शाळासोबत्याला दिलासा