राष्ट्रीय

आगीत दाम्पत्यासह तीन मुलांचा जळून मृत्यू

पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तेथे पाच जळालेले मृतदेह मिळाले.

Swapnil S

बरेली : फरीदपूर येथे शनिवारी रात्री एका घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. बरेलीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात हे कुटुंब भाड्याच्या घरात राहात होते. रविवारी सकाळी घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना तेथे पाच जळालेले मृतदेह मिळाले. अजय गुप्ता (३८), त्यांची पत्नी अनिता (३६), मुले दिव्यांश (९), दक्ष (३) आणि मुलगी दिव्यांका (६) अशी त्यांची नावे आहेत. आग कशी लागली, याचा शोध चालू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून अंत्यसंस्काराचा सर्व खर्च सरकार करणार आहे, असे जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी सांगितले.

बंगालमध्ये 'कमळ', तमिळनाडूत 'विजय'; आसाममध्ये BJP ची हॅटट्रिक; दक्षिण मात्र अजूनही दूरच, केरळने डाव्यांना डावलले

सुनेत्रा पवारांचा विक्रम! बारामतीत दोन लाख १८ हजारांच्या फरकाने ऐतिहासिक विजय; राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी

'गंगोत्री ते गंगासागरापर्यंत' फुलले कमळ; जल्लोषाच्या सभेत मोदींचे प्रतिपादन

स्टालिन, विजय, ममतांशी राहुल यांनी साधला संवाद

जागतिक दमा दिवस २०२६ : उष्णतेच्या लाटा वाढवत आहेत दम्याचा त्रास; रुग्णांनी काय काळजी घ्यावी?