राष्ट्रीय

विधेयकांना विलंब ; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

दोन्ही राज्यपालांवर विधानसभेत मंजुर झालेली विधेयके मंजुरी देताना कोणतेही कारण न देता विलंब केला जात आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : विधेयकांना मंजुरी देण्यात राज्यपाल जाणुनबुजून विलंब करत असल्याचा आरोप होत आहे. तामिळनाडू व केरळ सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी दोन राज्य सरकारांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट सोमवारी सुनावणी करणार आहे.

दोन्ही राज्यपालांवर विधानसभेत मंजुर झालेली विधेयके मंजुरी देताना कोणतेही कारण न देता विलंब केला जात आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाकडे ही सुनावणी होणार आहे.

याचिकांवर सुनावणीपूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी अनेक विधेयक परत पाठवली आहेत. तामिळनाडू विधानसभेने शनिवारी एक विशेष अधिवेशन घेऊन १० विधेयके पुन्हा मंजूर केली आणि पुन्हा राज्यपालांकडे मंजुरीाठी पाठवली. यात कायदा, कृषी व उच्चशिक्षणासहित अनेक विधेयके आहेत.

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार