राष्ट्रीय

विधेयकांना विलंब ; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : विधेयकांना मंजुरी देण्यात राज्यपाल जाणुनबुजून विलंब करत असल्याचा आरोप होत आहे. तामिळनाडू व केरळ सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी दोन राज्य सरकारांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट सोमवारी सुनावणी करणार आहे.

दोन्ही राज्यपालांवर विधानसभेत मंजुर झालेली विधेयके मंजुरी देताना कोणतेही कारण न देता विलंब केला जात आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाकडे ही सुनावणी होणार आहे.

याचिकांवर सुनावणीपूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी अनेक विधेयक परत पाठवली आहेत. तामिळनाडू विधानसभेने शनिवारी एक विशेष अधिवेशन घेऊन १० विधेयके पुन्हा मंजूर केली आणि पुन्हा राज्यपालांकडे मंजुरीाठी पाठवली. यात कायदा, कृषी व उच्चशिक्षणासहित अनेक विधेयके आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस