राष्ट्रीय

दिल्ली सेवासंबंधी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अधिनियमाची जागा कायद्याने घेतल्यानंतर सुधारणा करणारी याचिका आवश्यक आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या दिल्ली सेवा कायद्याला दिल्ली सरकारने आधीच न्यायालयात आव्हान दिले असल्यामुळे या विषयावर नवी याचिका स्वीकारण्यात अर्थ नाही असे सांगत, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली प्रशासकीय सेवांवरील अधिकारांबाबतची नवी याचिका फेटाळून लावली.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहा, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या संदर्भात अधिक याचिकांची गरज नाही असे म्हटले आहे. दिल्ली सरकार आधीच या विषयावर न्यायालयात आले आहे. तेव्हा आपण येथे कशासाठी आला आहात, असे या खंडपीठाने याचिकाकर्त्यास विचारले. यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारची याचिका स्वीकारली आहे. संबंधित कायदा नंतर अधिनियमानंतर करण्यात आला होता या मुद्यावर ही याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे.

अधिनियमाची जागा कायद्याने घेतल्यानंतर सुधारणा करणारी याचिका आवश्यक आहे. केंद्र सरकारने १९ मे रोजी अधिनियम जारी केला होता. या अधिनियमामुळे दिल्ली शहरातील प्रशासकीय अधिकार नायब राज्यपालांच्या हाती व पर्यायाने केंद्र सरकारच्या हाती गेले होते.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी