राष्ट्रीय

प्रियंका, रॉबर्ट वढेरावर ईडीचे आरोपपत्र

Swapnil S

नवी दिल्ली : हरियाणात २००५-०६ मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी रिअल इस्टेट एजंटकडून तीन भूखंड खरेदी केल्याचा तसेच त्यांच्या पत्नी प्रियंका गांधी यांनी केलेल्या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी सुरू असल्याचा दावा ईडीने केला आहे. या अनुषंगाने ईडीने नुकतेच मनी लाँड्रिंग प्रकरणाचे आरोपपत्र दाखल केले आहे.

फेडरल एजन्सीने रॉबर्ट वढेरा यांच्याशी कथित संबंध असलेला एनआरआय उद्योगपती सी. सी. थम्पी आणि कथित मध्यस्थ संजय भंडारीचा नातेवाईक सुमित चढ्ढा यांच्याविरुद्ध नोव्हेंबरमध्ये आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रात रॉबर्ट वढेरा आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे नाव आरोपी म्हणून नसले, तरी तक्रारीत त्यांची नावे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दिल्लीतील विशेष प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ॲक्ट (पीएमएलए) न्यायालयाने २२ डिसेंबर रोजी या आरोपपत्राची दखल घेतली आणि पुढील सुनावणी २९ जानेवारी २०२४ रोजी ठेवली. या प्रकरणातील भंडारी २०१६ मध्ये ब्रिटनला पळून गेला आणि ब्रिटिश सरकारने सक्त अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांनी केलेल्या कायदेशीर विनंतीनुसार जानेवारीत त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली. परदेशात कथित अघोषित मालमत्ता ठेवल्याबद्दल कथित मध्यस्थाविरुद्ध मनी लाँड्रिंग आणि करचोरीच्या आरोपांची चौकशी सीबीआय व ईडी या दोन्ही संस्था करत आहेत.

ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की, २०१५ मध्ये थम्पीविरोधात परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) गुन्हा नोंदवल्यानंतर वढेरा जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांबद्दल ते समोर आले. एक "दीर्घ आणि घट्ट नाते" रॉबर्ट वढेरा आणि थम्पी यांच्यात अस्तित्वात असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. या प्रकरणी रॉबर्ट वढेरा यांची यापूर्वीही एजन्सीकडून चौकशी करण्यात आली होती आणि त्यांनी कोणताही गैरव्यवहार केल्याचा इन्कार केला होता.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त