राष्ट्रीय

मुलांसाठी आई-वडिलच सर्वकाही मुलाला भेटायला बापाला परवानगी ; दिल्ली हायकोर्टाचे आदेश

पित्याला एका वर्षापर्यंत मुलाची भेट घेता येईल, असे न्यायालयाने सांगितले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एखादा व्यक्तीने दुसरे लग्न केल्यानंतर त्याला पहिल्या पत्नीच्या मुलापासून दूर केले जाऊ शकत नाही. आई-वडिल आर्थिक संकटात असतानाही मुलांसाठी त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे सांगून दिल्ली हायकोर्टाने एका पित्याला आपल्या मुलाला भेटण्याची परवानगी दिली.

२०१० मध्ये या मुलाच्या आईचा मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांनी जावयाविरोधात हत्येची तक्रार केली. २ वर्षे तुरुंगात राहिल्यावर तो २०१२ मध्ये तुरुंगातून निर्दोष सुटला. या निकालाला सासऱ्याच्या मंडळींनी हायकोर्टात आव्हान दिले.

आईचा मृत्यू झाला तेव्हा हा मुलगा दीड वर्षांचा होता. वडिल तुरुंगात गेल्यावर तो आजी-आजोबांसोबत राहत होता. त्या आजी-आजोबांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेऊन नातवाची कायमस्वरुपी कस्टडी मागितली. कोर्टाने ती नाकारली. न्या. सुरेश कुमार कैत व न्या. नीना बन्सल शर्मा यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.

खंडपीठाने सांगितले की, पित्याच्याविरोधात फौजदारी गुन्हयाशिवाय कोणताही गुन्हा नाही. त्यामुळे त्याच्या पित्याला कस्टडीसाठी अयोग्य ठरवता येणार नाही. पित्याने दुसरे लग्न केले आहे. त्यातून त्याला दुसरा मुलगा आहे. त्यामुळे पहिली पत्नीपासून झालेल्या मुलाची कस्टडी त्याला देता येणार नाही. मात्र, पित्याला एका वर्षापर्यंत मुलाची भेट घेता येईल, असे न्यायालयाने सांगितले.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२