गोव्यामध्ये व्यावसायिक परवान्यांचे अविचारी वाटप; हायकोर्टाने अग्निकांडाची घेतली गंभीर दखल 
राष्ट्रीय

गोव्यामध्ये व्यावसायिक परवान्यांचे अविचारी वाटप; हायकोर्टाने अग्निकांडाची घेतली गंभीर दखल

दोन आठवड्यांपूर्वी गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन येथे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. अग्निकांडामुळे व्यावसायिक परवान्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Swapnil S

मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन येथे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. अग्निकांडामुळे व्यावसायिक परवान्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोव्यामध्ये व्यावसायिक परवान्यांचे अत्यंत अविचारीपणे वाटप केले जात आहे. याबाबत गोवा सरकारने गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर याचिका दाखल करून घेतली.

न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठासमोर एका खासगी जमिनीच्या वादाशी संबंधित याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी खंडपीठाने गोव्यातील अग्निकांडाचा उल्लेख करून तेथील परवान्यांच्या वाटपाबाबत चिंता व्यक्त करत काही वेळा स्थानिक कायदे अंमलात आणले जात नसल्याचे न्यायालय म्हणाले.

दरम्यान,  नाइट क्लबमधील आग प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना मंगळवारी थायलंडमधून दिल्लीला आणण्यात आले आहे. दिल्ली विमानतळावर गोवा पोलिसांच्या एका पथकाने दोघांना विमानतळावरच अटक केली. सौरभ आणि गौरव लुथरा ‘बिर्च नाइट क्लब’चे मालक आहेत. ६ डिसेंबर रोजी क्लबला आग लागली, त्यामध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर दोन्ही भाऊ थायलंडला पळून गेले होते. थायलंड पोलिसांनी ११ डिसेंबर रोजी फुकेतमध्ये दोन्ही भावांना ताब्यात घेतले. मंगळवारी सकाळी त्यांना बँकॉकहून भारतात पाठवण्यात आले. दोघांवर सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

ठाणेकरांनो लक्ष द्या; पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन दिवस लागणार