लोकसभेत हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब Photo : X
राष्ट्रीय

लोकसभेत हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब

लोकसभेत शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे प्रश्नोत्तराचा तास गोंधळामुळे विस्कळीत झाला. सभागृहाचे कामकाज आता ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्तेसाठी देशाचे विभाजन करावयाचे होते, असा आरोप भाजपने यावेळी केला.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभेत शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यामुळे प्रश्नोत्तराचा तास गोंधळामुळे विस्कळीत झाला. सभागृहाचे कामकाज आता ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्तेसाठी देशाचे विभाजन करावयाचे होते, असा आरोप भाजपने यावेळी केला.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे खासदार घोषणाबाजी करत होते. यानंतर सभापती संध्या राय यांनी लोकसभा दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केली. दुपारी १२ वाजता कामकाज सुरू झाले. या काळात शिक्षण आणि कायदा मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांसह अनेक मंत्र्यांनी विधेयके सादर केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होत आहे. २३ दिवसांच्या विश्रांतीनंतर, अधिवेशनाचा दुसरा भाग ९ मार्च रोजी सुरू होईल आणि तो २ एप्रिलपर्यंत चालेल. दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी राहुल गांधींवर आरोप केले की, ते सत्ता मिळवण्यासाठी देशाच्या फाळणीचे नियोजन करत होते.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी