PTI
राष्ट्रीय

बिहारमध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांची घरे पेटविली

नवाडा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात अनुसूचित जाती-जमातीतील ३४ जणांची घरे पेटविण्यात आली असून त्याचा गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी निषेध केला आहे.

Swapnil S

नवाडा : नवाडा जिल्ह्यात जमिनीच्या वादातून झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात अनुसूचित जाती-जमातीतील ३४ जणांची घरे पेटविण्यात आली असून त्याचा गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी निषेध केला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालकांना (कायदा-सुव्यवस्था) घटनास्थळी भेट देऊन तपासावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मांजी तोला परिसरातील घरे पेटविण्यात आली, त्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ जणाना अटक केली आहे. जवळपास २१ घरे जळून खाक झाली आहेत. सर्व संशयितांना शक्य तितक्या लवकर ताब्यात घेण्याच्या सूचनाही नितीशकुमार यांनी दिल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. संशयितांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं