राष्ट्रीय

असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाल्यामुळेओडिशा, आंध्रात वादळी पावसाची शक्यता

वृत्तसंस्था

असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम जाणवू लागला असून ओडिशा, बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मात्र, हे वादळ किनाऱ्यावर येताना कमजोर होत जाईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नसली तरी वादळी पाऊस किनारी भागाला झोडपून काढणार आहे.

बंगालच्या उपसागरात ज्या वेगाने हे वादळ दाखल झाले त्यावरून बंगाल आणि ओडिशामध्ये ९० ते १२५ किमी/ताशी या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याचदरम्यान वादळी पाऊसही पडेल. ओडिशाव्यतिरिक्त, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळ असनीचा प्रभाव दिसून येईल.

मान्सूनवर परिणाम नाही

या चक्रीवादळामुळे तूर्तास मान्सूनच्या भारतातील आगमनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Mumbai : थकीत मेंटेनन्सच्या पैशांची वसुली अनेक वर्षांनंतरही केली जाऊ शकते! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Mumbai : ७९ नगरसेवकांच्या निवडीला आव्हान; BMC तील निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट, माहिती अधिकारातून उघड

कर्नाटकात दोन हत्ती भिडले अन् क्षणात होत्याचं नव्हतं; पती-लेकीसमोरच महिलेचा चिरडून मृत्यू, हत्तींची अंघोळ पाहताना काळाचा घाला - Video

शिंदे सेना-भाजपमध्ये ठाण्यात संघर्ष पेटला; पक्षीय वाद नसल्याचा शिंदे सेनेचा दावा

Mumbai : समुद्रातील तरंगता कचरा काढणार इलेक्ट्रिक बोट; गेटवे ऑफ इंडिया व बधवार पार्क येथे मानवरहित बोट कार्यरत