भारत-रशिया एकमेकांच्या भूमीवर ३००० हजार सैनिक तैनात करणार; दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार लागू प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

भारत-रशिया एकमेकांच्या भूमीवर ३००० हजार सैनिक तैनात करणार; दोन्ही देशांमध्ये संरक्षण करार लागू

भारत आणि रशिया यांच्यातील ‘रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट’ संरक्षण करार आता लागू झाला आहे. याअंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर ३००० सैनिक तैनात करू शकतील. यासोबतच ५ युद्धनौका आणि १० लष्करी विमानांच्या तैनातीलाही परवानगी देण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील ‘रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट’ संरक्षण करार आता लागू झाला आहे. याअंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर ३००० सैनिक तैनात करू शकतील. यासोबतच ५ युद्धनौका आणि १० लष्करी विमानांच्या तैनातीलाही परवानगी देण्यात आली आहे.

दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांचे लष्करी तळ, हवाई तळ आणि बंदरांचा वापर करू शकतील, ज्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या लष्करी तैनाती आणि ऑपरेशन्स सोपे होतील. या करारामध्ये लॉजिस्टिक सपोर्टचाही समावेश आहे. याअंतर्गत इंधन, पाणी, दुरुस्ती, तांत्रिक संसाधने आणि इतर आवश्यक पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच, विमानांसाठी एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि उड्डाणांशी संबंधित सेवा देखील मिळतील.

करार युद्धासाठी नाही

हा करार फेब्रुवारी २०२५ मध्ये करण्यात आला होता आणि डिसेंबर २०२५ मध्ये रशियाने याला मंजुरी दिली. हा करार ५ वर्षांसाठी लागू राहील, ज्याला परस्पर संमतीने पुढे वाढवता येईल. तथापि, हा करार युद्धासाठी नाही. याचा वापर केवळ शांततेच्या काळात प्रशिक्षण, संयुक्त सराव आणि लॉजिस्टिक सहकार्यासाठी केला जाईल. या कराराला भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत होत असलेल्या धोरणात्मक भागीदारीतील एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी समन्वय आणि सहकार्य अधिक चांगले होईल.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन