राष्ट्रीय

अंतराळ मोहिमांसाठी भारताला अंतराळवीरांच्या समूहाची गरज! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

भारताच्या गगनयान मोहिमेसाठी पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ अनुभव नक्कीच मौल्यवान ठरेल. भारताला अंतराळ मोहिमेसाठी ४० ते ५० अंतराळवीरांच्या गटाची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताच्या गगनयान मोहिमेसाठी पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा अंतराळ अनुभव नक्कीच मौल्यवान ठरेल. भारताला अंतराळ मोहिमेसाठी ४० ते ५० अंतराळवीरांच्या गटाची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अंतराळवीर शुक्ला यंनी मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना ॲक्सिओम-४ मिशनसाठी नेलेला तिरंगा भेट दिला आणि अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो दाखवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या गगनयान मोहिमेसाठी शुक्ला यांचा अंतराळ अनुभव नक्कीच मौल्यवान ठरेल. शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला अंतराळ मोहिमेसाठी ४० ते ५० अंतराळवीरांच्या गटाची आवश्यकता आहे.

मोदींनी एक्सवर पोस्ट शेअर करत या बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले, शुभांशू शुक्ला यांच्याशी चांगला संवाद झाला. शुंभाशू शुक्ला यांचा अंतराळातील अनुभव, अंतराळ क्षेत्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच गगनयान मोहिमेबाबत भारताच्या आकांक्षा अशा विविध विषयांवर आम्ही चर्चा केली. भारताला शुभांशू शुक्ला यांचा अभिमान वाटतो.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन