दूषित पाण्यामुळे ६ जणांचा मृत्यू; २०० जण रुग्णालयात दाखल 
राष्ट्रीय

दूषित पाण्यामुळे ६ जणांचा मृत्यू; २०० जण रुग्णालयात दाखल

इंदूरमध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे उलट्या आणि अतिसाराचा उद्रेक झाला असून, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि २०० हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

Swapnil S

इंदूर : इंदूरमध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे उलट्या आणि अतिसाराचा उद्रेक झाला असून, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि २०० हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी शुक्रवारी दूषित पाण्यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले होते. मात्र, भगीरथपुरा परिसरातील रहिवाशांचा दावा आहे की सहा महिन्यांच्या एका बालकासह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. 'सध्या शहरातील ४१ रुग्णालयांमध्ये २०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि सहा जणांचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ३४ जण अतिदक्षता विभागात (आयसीयू) असून, त्यांच्या उपचारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी