दूषित पाण्यामुळे ६ जणांचा मृत्यू; २०० जण रुग्णालयात दाखल 
राष्ट्रीय

दूषित पाण्यामुळे ६ जणांचा मृत्यू; २०० जण रुग्णालयात दाखल

इंदूरमध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे उलट्या आणि अतिसाराचा उद्रेक झाला असून, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि २०० हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

Swapnil S

इंदूर : इंदूरमध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे उलट्या आणि अतिसाराचा उद्रेक झाला असून, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि २०० हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली.

इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी शुक्रवारी दूषित पाण्यामुळे १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले होते. मात्र, भगीरथपुरा परिसरातील रहिवाशांचा दावा आहे की सहा महिन्यांच्या एका बालकासह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला आहे. 'सध्या शहरातील ४१ रुग्णालयांमध्ये २०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि सहा जणांचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी ३४ जण अतिदक्षता विभागात (आयसीयू) असून, त्यांच्या उपचारांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

OCI कार्डधारकांना ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत संरक्षण; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai : अंधेरी-घाटकोपर प्रवाशांना मोठा दिलासा; मेट्रो वन आता दर ३ मिनिटांनी धावणार

Mumbai : पदपथांच्या पाहणीत हयगय झाल्यास अभियंते जबाबदार; 'पादचारी प्रथम' या अभियानांतर्गत प्रशासनाचा इशारा

Mumbai : डेंग्यूच्या अळ्यांची तपासणी जीवावर बेतली; कीटकनाशक विभागातील कर्मचाऱ्याचा पडून मृत्यू

Mumbai : मुलुंड येथील बेस्ट बस अपघात प्रकरण; चालकाविरोधात गुन्हा, बस पोलिसांच्या ताब्यात