संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

निवडणूक आयोगाने आता मतदार घोटाळ्याच्या प्रकरणांशी संबंधित माहिती देणे बंद केले आहे. निवडणूक आयोग आता भाजपचे बॅक ऑफिस बनले आहे का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने आता मतदार घोटाळ्याच्या प्रकरणांशी संबंधित माहिती देणे बंद केले आहे. निवडणूक आयोग आता भाजपचे बॅक ऑफिस बनले आहे का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला आहेत.

“मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, अलांड विधानसभा मतदारसंघात मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली होती. यासंदर्भात चौकशी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सुरुवातीला काही कागदपत्रे दिली होती, परंतु आता महत्त्वाचे पुरावे देण्यास नकार देत आहे, जेणेकरून खऱ्या गुन्हेगारांना वाचवता येईल,” असे खर्गे यांनी सांगितले.

दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप खर्गे यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, यापूर्वी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या मतचोरीच्या दाव्यांना निराधार म्हटले आहे. “मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, तपास संस्थांना अलांड विधानसभा मतदारसंघात ५,९९४ बनावट अर्ज आढळले होते, जे मतदारांना हटवण्याच्या मोठ्या प्रमाणात प्रयत्नाचा पुरावा होते. काँग्रेस सरकारने याप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले. तपासाच्या सुरुवातीला ईडीने पुरावे दिले होते, परंतु आता ते भाजपच्या दबावाखाली माहिती शेअर करत नाही,” अशी टीकाही खर्गे यांनी केली.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर! 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून यलो-ऑरेंज अलर्ट

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

आता वेटिंगचं नो टेन्शन! IRCTC च्या AI फीचर्समुळे रेल्वे तिकीट होणार मिनिटांत बुक; जाणून घ्या सीक्रेट ट्रिक

डेंग्यूची भीती आता कमी होणार? भारतात पहिली QDENGA लस; जाणून घ्या महत्त्वाची माहिती

'मी मॅन-हेटर आहे'; 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील वक्तव्यानंतर शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई? जाणून घ्या नेमकं प्रकरण