राष्ट्रीय

राहुल आणि अखिलेश यांच्या सभेत गोंधळ; भाषण न करताच निघून जाण्याची पाळी

इंडिया आघाडीची प्रयागराजमध्ये रविवारी सभा आयोजित करण्यात आली होती.

Swapnil S

प्रयागराज : इंडिया आघाडीची प्रयागराजमध्ये रविवारी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपाचे नेते अखिलेश यादव संबोधित करणार होते. मात्र, राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे व्यासपीठावर पोहोचताच समर्थकांनी बॅरेकेट्स तोडत व्यासपीठाकडे धाव घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे राहुल गांधी व अखिलेश यांना भाषण न करताच निघून जावे लागले.

अखिलेश यादव यांनी समर्थकांचा गोंधळ नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र, तरीही १५ ते २० मिनिटे गोंधळ सुरूच राहिला. अखेर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना भाषण न करताच निघून जावे लागले. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. या सभेला लोकांनी केलेल्या गर्दीची मोठी चर्चा रंगली आहे.

फूलपूर लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल रमण सिंह यांच्या प्रचारासाठी अखिलेश यादव आणि राहुल गांधी आले होते. मात्र, समर्थकांनी बॅरेकेट्स तोडत व्यासपीठाकडे धाव घेत केलेल्या गोंधळानंतर अखिलेश यादव हे संतापून निघून गेले. त्यानंतर राहुल गांधीही निघून गेले. दरम्यान, लोकांनी राहुल गांधी यांच्या या सभेला केलेल्या अभूतपूर्व गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बचत गटाच्या महिलांना जीएसटीचे प्रशिक्षण; GST बिल मिळवणे होणार एकदम सुलभ; BMC च्या एफ-दक्षिण विभागाचा उपक्रम

अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर कारवाई सुरू; वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभाग सक्रिय

म्हाडाच्या महागड्या घरांच्या किमती कमी होणार? घरांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने फेरविचाराची शक्यता

वाढता खर्च, दरवाढीवरील निर्बंधांमुळे बिअर उद्योग संकटात; युद्धामुळे कच्च्या मालाचे दर कडाडले; १५ टक्के दरवाढीची सरकारकडे मागणी

नो-पार्किंगमध्ये थर्मो प्लास्टिकचा रंग; BMC च्या वाहनतळात वाहन पार्किंग करा; बेकायदा पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी निर्णय