नवी दिल्ली : केंद्र सरकारने एलपीजी रिफिलच्या बुकिंगसाठीचा कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवसांपर्यंत कमी केला आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी दिली.
२५ दिवसांचा हा सुधारित बुकिंग कालावधी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील एलपीजी ग्राहकांसाठी समानरीत्या लागू असेल. गोपी यांनी पेट्रोलियम मंत्रालयाने तेल विपणन कंपन्यांना पाठवलेल्या पत्राची प्रत फेसबुक पोस्टद्वारे शेअर केली.
फेब्रुवारी २०२६ मध्ये मध्य पूर्वेतील संघर्ष सुरू असताना, मागणी व्यवस्थापनाचा तात्पुरता उपाय म्हणून मंत्रालयाने १२ मार्च २०२६ रोजीच्या पीआयबी प्रसिद्धीपत्रकाद्वारे एलपीजी रिफिल बुकिंगसाठी शहरी भागांत २५ दिवस आणि ग्रामीण भागांत ४५ दिवस अशा कालमर्यादा निश्चित केल्या होत्या, असे त्या पत्रात म्हटले आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, मध्य पूर्वेतील संघर्षामुळे एलपीजी पुरवठ्यावर निर्माण झालेल्या ताणामुळे रिफिल बुकिंगच्या कालावधीत बदल करण्यात आला होता.