मोहन भागवत  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

स्मशान, मंदिर, पाणी हे सर्व हिंदूंसाठी एकच हवेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

वाराणसी : स्मशान, मंदिर, पाणी हे सर्व हिंदूंसाठी एकच असायला हवेत. त्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करत आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

Swapnil S

वाराणसी : स्मशान, मंदिर, पाणी हे सर्व हिंदूंसाठी एकच असायला हवेत. त्यासाठीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करत आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.

वाराणसी येथे काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आयआयटी बीएचयूच्या जिमखाना मैदानात लागलेल्या संघाच्या शाखेत ते पोहचले. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

ते म्हणाले की, हिंदू समाजाचे सर्व पंथ, जाती एकत्रित यायला हवेत ही संघाची कल्पना आहे. हिंदू समाजाला संघटित करण्याचा उद्देश संघाचा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे होत आहेत, तर संघ काय करणार? असा प्रश्न आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्याने त्यांना विचारला, त्यावर ते म्हणाले की, गेल्या १०० वर्षांपासून संघ जे काम करत आहे, तेच काम पुढेही चालू ठेवेल. भारतीय संस्कृती, भारतीय मूल्यांचे संरक्षण व त्यांच्या आदर्शांचा प्रचार व्हायला हवा. या मुद्द्यावर ते काय विचार करतात, हेही सरसंघचालकांनी जाणून घेतले.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक