राष्ट्रीय

पंतप्रधान मोदी-जिनपिंग यांच्यात चालता चालता चर्चा

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात हिंसाचार झाल्यापासून भारत-चीनचे संबंध अधिक तणावपूर्ण झाले असतानाच ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यात गुरुवारी चालता चालता चर्चा झाली आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याचे प्रयत्न वेगाने करायला आदेश देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती बनली, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील न सुटलेल्या मुद्यांवर चिंता बोलून दाखवली. दोन्ही देशांतील संबंध सामान्य ठेवण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता राखणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेचा सन्मान राखणे आवश्यक आहे, असे क्वात्रा यांनी सांगितले.

ब्रिक्स बिझनेस फोरम हा ब्रिक्स करारातील महत्त्वाचा भाग आहे. लवचिक, सर्वसमावेशक पुरवठा साखळी तयार करण्याबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली. ब्रिक्स देशातील परस्पर विश्वास व पारदर्शकता यावर चर्चा झाली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस