राष्ट्रीय

संसद टीव्हीचे राहुल गांधी यांच्या भाषणावर लक्ष कमी - काँग्रेसचा आरोप

मोदी सरकारला नेमकी कशाची भीती वाटते, असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केलेल्या भाषणावर संसद टीव्ही या वाहिनीने फारसे लक्ष दिले नाही, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेच्या दरम्यान राहुल यांनी बुधवारी लोकसभेत भाषण केले. त्यांचे भाषण १२ वाजून ९ मिनिटांनी सुरू झाले आणि १२ वाजून ४६ मिनिटांनी संपले. या एकूण ३७ मिनिटांपैकी १४ मिनिट ३७ सेकंद संसद टीव्हीचा कॅमेरा राहुल यांच्या दिशेने होता. म्हणजेच संसद टीव्हीने भाषणाच्या केवळ ४० टक्के वेळच राहुल यांच्यावर फोकस ठेवला, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजाचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या संसद टीव्हीवर राहुल यांना पुरेसा वेळ न देण्यात आला नाही. मोदी सरकारला नेमकी कशाची भीती वाटते, असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...