राष्ट्रीय

संसद टीव्हीचे राहुल गांधी यांच्या भाषणावर लक्ष कमी - काँग्रेसचा आरोप

मोदी सरकारला नेमकी कशाची भीती वाटते, असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केलेल्या भाषणावर संसद टीव्ही या वाहिनीने फारसे लक्ष दिले नाही, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेच्या दरम्यान राहुल यांनी बुधवारी लोकसभेत भाषण केले. त्यांचे भाषण १२ वाजून ९ मिनिटांनी सुरू झाले आणि १२ वाजून ४६ मिनिटांनी संपले. या एकूण ३७ मिनिटांपैकी १४ मिनिट ३७ सेकंद संसद टीव्हीचा कॅमेरा राहुल यांच्या दिशेने होता. म्हणजेच संसद टीव्हीने भाषणाच्या केवळ ४० टक्के वेळच राहुल यांच्यावर फोकस ठेवला, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजाचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या संसद टीव्हीवर राहुल यांना पुरेसा वेळ न देण्यात आला नाही. मोदी सरकारला नेमकी कशाची भीती वाटते, असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला.

इराणच्या राजधानीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला; आणीबाणी जाहीर, भारतीय नागरिकांना दूतावासाचा इशारा

"तो भारदस्त आवाज पुन्हा…"; अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबीयांच्या भावनिक पोस्ट

होळीला कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! मुंबई-विजयदुर्ग Ro-Ro सेवा उद्यापासून सुरू; जाणून घ्या वेळापत्रक आणि तिकीट दर

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; मुख्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक

वाहतूकदारांचा 'महाराष्ट्र बंद'चा इशारा; ५ मार्चला १ लाख वाहनांसह 'चलो आझाद मैदान'; ई-चलन व जाचक अटींविरोधात आरपारचा लढा