राष्ट्रीय

हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला ; ८८ जणांचा मृत्यू, १६ जण बेपत्ता

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी परिस्थितीमध्ये बरीच सुधारणा झाल्याचं सांगितलं आहे. परंतु अद्याप बरेच काम करणे बाकी असल्याचं ते म्हणाले

नवशक्ती Web Desk

हिमाचल प्रदेशासह उत्तर भारतात सध्या पावसाने कहर केला आहे. भूस्खलन, वीजपुरवठा खंडित, अडवलेले रस्ते आमि खराब झालेल्या पुलांमुळे राज्यभर जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेशात विविध भागात अजूनही अनेक पर्यटक अटकलेले आहे. अशात या महाप्रलयात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८८ वर पोहचली आहे. तर नैसर्गिक आपत्तीत ३ ते ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे ८८ जणांचा बळी गेला आहे. तर १६ जण बेपत्ता आहे. १०० जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. या आपत्तीत राज्यभरात ४९२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

चंदीगड-मनाली, आणि शिमला-कालका महामार्गांसह १,३०० हुन अधिक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. मनाली ते मंडी ही एकेरी वाहतूक काल रात्री उघडण्यात आली आणि रात्रभर १.००० हून अधित अडकलेल्या पर्यटकांची वाहने या मार्गावरुन गेली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी परिस्थितीमध्ये बरीच सुधारणा झाल्याचं सांगितलं आहे. परंतु अद्याप बरेच काम करणे बाकी असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर १५ जुलै पर्यंत राज्यभरातील शाळा बंद असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; कॉकरोच जनता पार्टीचे 'एक्स' अकाउंट पुन्हा सुरू करण्याचे आदेश

Mumbai : धरणक्षेत्रात पाऊसधारा; २४ तासांत पाणीसाठ्यात ३.७३ टक्क्यांनी वाढ

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

उरण : जेएनपीए बंदरात वादळी वाऱ्याचा तडाखा; कंटेनर पडून एका कामगाराचा मृत्यू

मुसळधार पावसानंतर ठाण्यात अस्वच्छतेचे साम्राज्य; झाडांच्या फांद्या अद्याप रस्त्यांवर, नागरिकांकडून तातडीने साफसफाईची मागणी