राष्ट्रीय

इंडिया आघाडीत बिघाडीचे संकेत

कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ते त्यावेळी कळेल, असे सौरभ भारद्वाज म्हणाले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची पुढील आणि निर्णायक बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. त्यापूर्वीच इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस पक्षाने बुघवारी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यानंतर दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी ७ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले, त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. आप पक्षाने यावर तीव्र प्रतिक्रिया देतांना याचा निर्णय आता इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकित होर्इल असे म्हटले आहे. नवी दिल्लीच्या सरकारमध्ये मंत्री असलेले आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी अशा गोष्टी समोर येत राहतील, ज्यावेळी इंडिया आघाडीच्या पक्षांचे नेते एकत्र येतील त्यावेळी वरिष्ठ नेतृत्त्व जागा वाटपावर चर्चा करेल, असे म्हटले. तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ते त्यावेळी कळेल, असे सौरभ भारद्वाज म्हणाले.

THANE : घोडबंदर रोडवर मध्यरात्री वाहतूक निर्बंध; प्रवासाआधी जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai : अखेर प्रतीक्षा संपली! मेट्रो लाईन २बी आणि ९चा शुभारंभ; दहिसर-काशीगाव मार्गावर सेवा सुरु, जाणून घ्या वेळापत्रक

हजारो कोटींची टेंडर्स मॅनेज, सर्वांचे कमिशनही 'फिक्स'; नाशिकमधील प्रस्तावित कुंभमेळा टेंडर्स बाबत लाचखोर अधिकाऱ्याचे धक्कादायक दावे 

VIP गेट तोडून दिल्ली विधानसभेत प्रवेश केलेल्या सरबजीत सिंगला अटक; पोलिस तपासात कारण उघड, म्हणाला...

Nashik : "रांगेत उभे राहू नका, ३ हजार द्या"; त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची लूट, VIDEO व्हायरल