मणिपूरमध्ये ६ नागा नागरिकांची हत्या (Photo-X/@epaomanipur)
राष्ट्रीय

मणिपूरमध्ये ६ नागा नागरिकांची हत्या

मणिपूरमध्ये सहा नागा नागरिकांच्या झालेल्या हत्येचा नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Swapnil S

कोहिमा : मणिपूरमध्ये सहा नागा नागरिकांच्या झालेल्या हत्येचा नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही घटना ‘भयानक आणि अमानुष’ असल्याचे वर्णन करत त्यांनी दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच नागालँड, मणिपूर आणि नागा-बहुल भागातील लोकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

रिओ यांनी म्हटले की, ही घटना जास्त वेदनादायी आहे कारण नागा संघटनांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या १४ ओलीस व्यक्तींची सुरक्षित सुटका केली होती आणि त्यांच्या संपूर्ण कैदेत त्यांचे कल्याण, सुरक्षा व सन्मानाची खात्री केली होती; त्यानंतर ही हत्येची घटना घडली आहे.

मणिपूर पोलिसांनी बुधवारी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र गटांनी ओलीस ठेवलेल्या आणि बेपत्ता असलेल्या सहा नागा पुरुषांचे मृतदेह त्यांना सापडले आहेत. रिओ यांनी भारत सरकार आणि मणिपूर सरकारला न्याय सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले असून, दोषींची ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि कायद्यानुसार त्यांच्यावर खटला चालवावा अशी मागणी केली आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके