मणिपूरमध्ये ६ नागा नागरिकांची हत्या (Photo-X/@epaomanipur)
राष्ट्रीय

मणिपूरमध्ये ६ नागा नागरिकांची हत्या

मणिपूरमध्ये सहा नागा नागरिकांच्या झालेल्या हत्येचा नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

Swapnil S

कोहिमा : मणिपूरमध्ये सहा नागा नागरिकांच्या झालेल्या हत्येचा नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ही घटना ‘भयानक आणि अमानुष’ असल्याचे वर्णन करत त्यांनी दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच नागालँड, मणिपूर आणि नागा-बहुल भागातील लोकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

रिओ यांनी म्हटले की, ही घटना जास्त वेदनादायी आहे कारण नागा संघटनांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या १४ ओलीस व्यक्तींची सुरक्षित सुटका केली होती आणि त्यांच्या संपूर्ण कैदेत त्यांचे कल्याण, सुरक्षा व सन्मानाची खात्री केली होती; त्यानंतर ही हत्येची घटना घडली आहे.

मणिपूर पोलिसांनी बुधवारी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र गटांनी ओलीस ठेवलेल्या आणि बेपत्ता असलेल्या सहा नागा पुरुषांचे मृतदेह त्यांना सापडले आहेत. रिओ यांनी भारत सरकार आणि मणिपूर सरकारला न्याय सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले असून, दोषींची ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि कायद्यानुसार त्यांच्यावर खटला चालवावा अशी मागणी केली आहे.

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

भारताचा दिग्गज नेमबाज हरपला! मनू भाकरचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे निधन, ४९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

मृतदेहाच्या गुप्तांगावरील विनोद भोवला! KEM ची डॉक्टर तरुणी अडचणीत; ३७० बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेच्या शोतील आणखी एक क्लिप व्हायरल

Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत