राष्ट्रीय

कॅबिनेटचे निर्णय राज्यपालांना पाळणे बंधनकारक; मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी

कॅबिनेटने घेतलेले निर्णय राज्यपालांना पाळणे बंधनकारक आहेत. ते कॅबिनेटचे निर्णय बदलू शकत नाही,

Swapnil S

चेन्नई : कॅबिनेटने घेतलेले निर्णय राज्यपालांना पाळणे बंधनकारक आहेत. ते कॅबिनेटचे निर्णय बदलू शकत नाही, अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे.

मद्रास हायकोर्टाने पुझल तुरुंगात २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या वीर भारतीच्या याचिकेवरील सुनावणीवेळी ही टिप्पणी केली. वीर भारतीने आपले तुरुंगातील आचरण चांगले असल्याने माझी लवकरच सुटका करावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळाने वीर भारती यांच्या सुटकेला मंजुरी दिली. पण, राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्य सरकारच्या निकालावर स्थगिती दिली. त्यांनी वीर भारतीला हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. या याचिकेवर सुनावणी करताना न्या. एस. एम. सुब्रमण्यम व न्या. शिवाग्नानम यांच्या खंडपीठाने सांगितले की, राज्यपाल आर. एन. रवी यांचे या प्रकरणात कोणतेही वैयक्तिक, नैतिक अधिकार असू नयेत. वीर भारती यांची प्रक्रिया संपेपर्यंत त्यांना हंगामी जामीन देण्यात यावा, असे खंडपीठाने सांगितले.

Bihar Election Results 2025 Live Updates: अखेर राघोपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर, फक्त २१९ मतांचा लीड; ट्रेंड्समध्ये NDA ने ओलांडला बहुमताचा आकडा

Mumbai : आयुक्तांच्या OSD विरोधात शड्डू; मुंबई पालिका सहाय्यक आयुक्तांचे थेट आयुक्तांनाच पत्र

ठाण्यात तब्बल साडेचार लाख मतदारांची भर; आज जाहीर होणार अंतिम यादी

अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी? ‘वर्षा’वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा

Delhi car blast: दहशतवाद्यांना बाबरीचा बदला घ्यायचा होता; देशभरात ३२ कारमध्ये स्फोट घडवण्याचा होता कट; तपासातून माहिती उघड