राष्ट्रीय

सर्पदंशांवर काहीतरी उपाययोजना करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

देशात साप चावल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्पदंशांवर काहीतरी उपाययोजना करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात साप चावल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्पदंशांवर काहीतरी उपाययोजना करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले.

न्या. बी.आर. गवई आणि न्या. एस.वी.एन. भट्टी यांच्या खंडपीठाने याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली.

त्यावेळी खंडपीठाने सांगितले की, हे प्रकरण कज्जेदलालीसाठी नाही. तुम्ही राज्यांची मदत घेऊ शकता. कारण ही समस्या संपूर्ण देशाची आहे. राज्यांसोबत बैठक घेऊन काहीतरी करावे.

याबाबतच्या याचिकेत म्हटले आहे की, देशात सर्प विष प्रतिबंधक लसींची कमतरता आहे. जगात साप चावल्यामुळे सर्वात जास्त मृत्यू भारतात होतात. दरवर्षी ५८ हजार जणांचा बळी साप चावल्यामुळे होत असतो.

सहा आठवड्यानंतर पुढील सुनावणी

याबाबत केंद्राने उचललेल्या निर्णयांची माहिती सुप्रीम कोर्टात सादर केली जाईल. तर काही राज्यांच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ आठवड्यांनंतर केली जाणार आहे.

"जयंती म्हणून मानताना मन तुटून जातंय..."; अजितदादांच्या आठवणीत सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai : उड्डाणपूल, भुयारी मार्ग, स्कायवॉकचे जाळे विस्तारणार; महापालिका सल्लागाराची नियुक्ती करणार

Mumbai : हायकोर्टाने सरकार, पालिकेला ठणकावले; सार्वजनिक प्रकल्प अर्ध्यावर रद्द केल्यास अधिकाऱ्यांनी स्वत: भरपाई द्यावी

Mumbai : ई-कचरा व्यवस्थापनासाठी व्यापक धोरण! वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट; पालिका सभागृहाची मंजुरी