राष्ट्रीय

सर्पदंशांवर काहीतरी उपाययोजना करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश

देशात साप चावल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्पदंशांवर काहीतरी उपाययोजना करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात साप चावल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्पदंशांवर काहीतरी उपाययोजना करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले.

न्या. बी.आर. गवई आणि न्या. एस.वी.एन. भट्टी यांच्या खंडपीठाने याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली.

त्यावेळी खंडपीठाने सांगितले की, हे प्रकरण कज्जेदलालीसाठी नाही. तुम्ही राज्यांची मदत घेऊ शकता. कारण ही समस्या संपूर्ण देशाची आहे. राज्यांसोबत बैठक घेऊन काहीतरी करावे.

याबाबतच्या याचिकेत म्हटले आहे की, देशात सर्प विष प्रतिबंधक लसींची कमतरता आहे. जगात साप चावल्यामुळे सर्वात जास्त मृत्यू भारतात होतात. दरवर्षी ५८ हजार जणांचा बळी साप चावल्यामुळे होत असतो.

सहा आठवड्यानंतर पुढील सुनावणी

याबाबत केंद्राने उचललेल्या निर्णयांची माहिती सुप्रीम कोर्टात सादर केली जाईल. तर काही राज्यांच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ आठवड्यांनंतर केली जाणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत