फोटो सौ ; FPJ
राष्ट्रीय

तेलंगणात ‘उष्माघात’ नैसर्गिक आपत्ती जाहीर; मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख मिळणार

तेलंगणा सरकारने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटा आणि उन्हाच्या तडाख्याला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे.

Swapnil S

हैद्राबाद : तेलंगणा सरकारने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटा आणि उन्हाच्या तडाख्याला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे. यामुळे राज्यात उष्माघातामुळे बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामुळे तेलंगणा हे उष्णतेच्या लाटांना आपत्ती श्रेणी म्हणून स्वतंत्रपणे मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे, ज्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मदत मिळू शकते.

केंद्राने आपत्ती व्यवस्थापन कायदा (डीएम कायदा), २००५ अंतर्गत मान्यताप्राप्त १३ आपत्तींच्या यादीतून उष्णतेच्या लाटा वगळणे सुरूच ठेवले आहे. ज्यामुळे उष्णतेशी संबंधित घटनांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये (एनडीआरएफ) मदत नाकारली जात आहे.

तेलंगणामध्ये २०२० मध्ये ९८ जणांचा, २०२१ मध्ये ४३ आणि २०२२ मध्ये ६२ मृत्यू उष्णतेच्या लाटांमुळे झाले.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

Puducherry Assembly Elections 2026 : मतदान केंद्रावर साडीतील रोबोट! पुदुच्चेरीत 'निला'कडून मतदारांचे स्वागत; VIDEO व्हायरल

Mumbai : ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करा! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

"कुत्र्याची शेपूट वाकडीच...त्याच्या तोंडाला काळं फासून..."; शक्तिमानची खिल्ली उडवल्याने मुकेश खन्ना भडकले, समय रैनाला चांगलेच झापले

भोंदू अशोक खरात प्रकरण : अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे महागात, गुन्हा दाखल