फोटो सौ ; FPJ
राष्ट्रीय

तेलंगणात ‘उष्माघात’ नैसर्गिक आपत्ती जाहीर; मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख मिळणार

तेलंगणा सरकारने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटा आणि उन्हाच्या तडाख्याला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे.

Swapnil S

हैद्राबाद : तेलंगणा सरकारने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटा आणि उन्हाच्या तडाख्याला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे. यामुळे राज्यात उष्माघातामुळे बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.विशेष मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामुळे तेलंगणा हे उष्णतेच्या लाटांना आपत्ती श्रेणी म्हणून स्वतंत्रपणे मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य बनले आहे, ज्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत मदत मिळू शकते.

केंद्राने आपत्ती व्यवस्थापन कायदा (डीएम कायदा), २००५ अंतर्गत मान्यताप्राप्त १३ आपत्तींच्या यादीतून उष्णतेच्या लाटा वगळणे सुरूच ठेवले आहे. ज्यामुळे उष्णतेशी संबंधित घटनांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये (एनडीआरएफ) मदत नाकारली जात आहे.

तेलंगणामध्ये २०२० मध्ये ९८ जणांचा, २०२१ मध्ये ४३ आणि २०२२ मध्ये ६२ मृत्यू उष्णतेच्या लाटांमुळे झाले.

Kasara Ghat Landslide : जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, Video

ठाणे, रायगडमध्ये पावसाने दाणादाण! १ ठार, १ बेपत्ता; ११० झाडे कोसळली, घरांमध्ये शिरले पाणी, अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला

काँग्रेसचे आजपासून राज्यभर आंदोलन; ९ जुलैपासून 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह

हेरिटेज इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या इमारतीचा दगड कोसळला

Mumbai : पावसामुळे दाणादाण! सात दिवसांत ११ मृत्यू, २२ जखमी; एक हजाराहून अधिक झाडे कोसळली, १३०० हून अधिक फांद्या कोसळल्या