PM
राष्ट्रीय

रेल्वे स्थानकावर पाण्याची टाकी पडून दोन जण ठार, १५ जखमी

या दुर्घटनेनंतर रेल्वे अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या टाकी खाली दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला

नवशक्ती Web Desk

वर्धमान : प. बंगालच्या वर्धमान रेल्वे स्थानकात पाण्याची टाकी फलाटावर पडली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

या दुर्घटनेनंतर रेल्वे अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या टाकी खाली दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन सर्वांची सुटका केली. सर्व जखमींना रुग्णालयात पाठवले आहे.

रेल्वेने सांगितले की, पाण्याची टाकी फलाट क्रमांक २ व ३ वर पडली. या टाकीचा काही भाग रेल्वे मार्गावर पडला. त्यामुळे रेल्वेमार्गातील दगड उडून प्रवाशांना लागले. त्यात काही जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर रेल्वेने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

Mumbai : 'जय हो' बंद होणार? ब्रिच कँडी रहिवाशांच्या तक्रारीनंतर 'मेलोडी रोड' बंद करण्याचा निर्णय

Mumbai-Pune Expressway : 'प्रत्येक विकेंडला हीच दशा'; लोणावळ्यात महामार्गावर भीषण कोंडी, प्रवाशांचा उद्रेक

Mumbai : मिठीतील गाळ उपशाला वेग! ४ एप्रिलपासून वेगाने होणार काम; ९ लाख मेट्रिक टन गाळ उपसा करण्याचे उद्दिष्ट

४८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील 'रत्न भांडार' उघडले; दागिन्यांच्या मोजमापास सुरुवात

राज्याचे तापमान वाढणार; उष्ण व दमट हवामान; विजांसह पावसाची शक्यता