राष्ट्रीय

...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू; भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिका सरकारचा इशारा

भारतातील अमेरिकन दूतावासाने बुधवारी भारतीय विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशन नियमांबाबत कडक इशारा दिला आहे. अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो आणि देशाबाहेर हकालपट्टीही होऊ शकते, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत-अमेरिका संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांत निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद आता थेट विद्यार्थ्यांवरही उमटताना दिसत आहेत. भारतातील अमेरिकन दूतावासाने बुधवारी भारतीय विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशन नियमांबाबत कडक इशारा दिला आहे. अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो आणि देशाबाहेर हकालपट्टीही होऊ शकते, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

अमेरिकन दूतावासाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, अमेरिकेचे कायदे मोडल्यास तुमच्या विद्यार्थी व्हिसावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तुम्हाला अटक झाली किंवा कोणताही कायदा मोडला, तर तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. तुम्हाला देशातून बाहेर काढले जाऊ शकते आणि भविष्यात अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. नियमांचे पालन करा आणि तुमचा शैक्षणिक प्रवास धोक्यात घालू नका. अमेरिकन व्हिसा हा अधिकार नाही, तर एक सुविधा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

चिंता वाढली

या स्पष्ट शब्दांमुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या किंवा आधीच तेथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अमेरिकेने यापूर्वीही भारतातून जाणाऱ्या अवैध स्थलांतरितांबाबत कठोर इशारे दिले आहेत. इमिग्रेशन कायदे मोडल्यास मोठ्या फौजदारी शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, असे अमेरिकेने स्पष्ट केले होते. अमेरिकी प्रशासन सध्या अवैध स्थलांतर, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग आणि इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन यासंबंधी प्रकरणांत व्हिसा रद्द करणे आणि देशाबाहेर काढणे अशा कठोर कारवाया करत आहे.

एच-१बी व्हिसा

अमेरिकन प्रशासन सध्या एच-१बी आणि विद्यार्थी व्हिसा नियम अधिक कडक करत आहे. याचा थेट परिणाम परदेशी, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर दिसून येत आहे. आकडेवारीनुसार गेल्या वर्षी अमेरिकेतील नवीन आंतरराष्ट्रीय प्रवेशांमध्ये १७ टक्क्यांची घट झाली. ऑगस्ट २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या आगमनात वर्षागणिक १९ टक्के घट नोंदवण्यात आली. ही घट २०२१ नंतरची सर्वात मोठी मानली जात आहे.

दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक; अकासा एअर आणि स्पाइसजेटचे नुकसान, प्रवासी सुखरूप

TCS प्रकरणात दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी नाशिकमध्ये; १५० कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे निर्देश

गोरेगावमधील मोतीलालनगर पुनर्विकासाचा मास्टर प्लान लवकरच; उच्च दर्जाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार

VIDEO : लखनऊमधील झोपडपट्टीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांमुळे शेकडो झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे बेघर

Bigg Boss Marathi 6: पहिली फायनलिस्ट तन्वी कोलते अडचणीत? 'त्या' वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप, विजेतेपदाच्या चर्चेला नवं वळण