ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना 'ज्ञानपीठ'  
राष्ट्रीय

ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना 'ज्ञानपीठ'

सुप्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर. वैरामुथू यांना २०२५ चा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. तमिळ साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्ञानपीठ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Swapnil S

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर. वैरामुथू यांना २०२५ चा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. तमिळ साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्ञानपीठ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वैरामुथू यांची ३७ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यामध्ये कवितासंग्रह, कादंबरी आणि अन्य साहित्य प्रकारांचा समावेश आहे. आपल्या जवळपास ४० हून अधिक वर्षांच्या कारकीर्दीत वैरामुथू यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांना सात वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही (सर्वश्रेष्ठ गीतकार) सन्मानित करण्यात आले आहे.

प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ज्ञानपीठ निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीमधअये माधव कौशिक, दामोदर मौझो, सुरंजन दास, ए. कृष्णा राव, प्रफुल्ल शिलेदार, केशुभाई देसाई, जानकी प्रसाद शर्मा, के. - श्रीनिवास राव आणि महेश्वर यांचा समावेश आहे.

Maharashtra HSC Result 2026 : आज बारावीचा निकाल लागणार; ऑनलाईन चेक करा एका क्लिकवर, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

जनगणना दोन टप्प्यात! नागरिकांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करावी; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जनगणना-२०२७’चा शुभारंभ

Mumbai : ‘नीट’ परीक्षेमुळे मध्य रेल्वेचा रविवारचा ब्लॉक रद्द; शनिवारी मेगाब्लॉक, रात्री ११.१६ वाजता CSMTहून शेवटची लोकल

Pune : सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; हत्या करुन शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला मृतदेह

Mumbai : पालिकेचे ३ कर्मचारी गंभीर जखमी; पवईत गटार साफ करताना अंगावरून टेम्पो गेल्याची धक्कादायक घटना