ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना 'ज्ञानपीठ'  
राष्ट्रीय

ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना 'ज्ञानपीठ'

सुप्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर. वैरामुथू यांना २०२५ चा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. तमिळ साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्ञानपीठ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Swapnil S

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर. वैरामुथू यांना २०२५ चा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. तमिळ साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्ञानपीठ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वैरामुथू यांची ३७ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यामध्ये कवितासंग्रह, कादंबरी आणि अन्य साहित्य प्रकारांचा समावेश आहे. आपल्या जवळपास ४० हून अधिक वर्षांच्या कारकीर्दीत वैरामुथू यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांना सात वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही (सर्वश्रेष्ठ गीतकार) सन्मानित करण्यात आले आहे.

प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ज्ञानपीठ निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीमधअये माधव कौशिक, दामोदर मौझो, सुरंजन दास, ए. कृष्णा राव, प्रफुल्ल शिलेदार, केशुभाई देसाई, जानकी प्रसाद शर्मा, के. - श्रीनिवास राव आणि महेश्वर यांचा समावेश आहे.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती