राष्ट्रीय

आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू! विजय मल्ल्याला हायकोर्टाने सुनावले

कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्याेगपती विजय मल्ल्या याला उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.

Swapnil S

मुंबई : कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्याेगपती विजय मल्ल्या याला उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. मल्ल्याने फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे.

तथापि, त्याच्या याचिकेच्या वैधतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ‘आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू’, असेही न्यायालयाने फरार विजय मल्ल्याला सुनावले. मल्ल्या भारतात परत कधी येणार हे निश्चित झाल्यानंतरच याचिकेवर सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालय म्हणाले.

फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंकड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. विजय मल्ल्यातर्फे ॲड. अमित देसाई यांनी बाजू मांडली. मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्तींनी मल्ल्याला उद्देशून “तुम्ही आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू’ असे सुनावले.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना जयपूर आंदोलनात मारहाण; Video व्हायरल, घटनेनंतर दिपके यांची पोस्ट चर्चेत

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकातील 'डान्सिंग गर्ल'वरून वाद; मोहेंजोदडोची मूळ प्रतिमा बदलल्याची चर्चा

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत