Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस 
नवी मुंबई

Navi Mumbai : रॅपिडोच्या नावाखाली दुचाकी चोरणारा जेरबंद; ५ मोटारसायकलींसह २ मोबाईल जप्त करत ७ गुन्हे उघडकीस

नवी मुंबईतील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले असून, नेरूळ पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले असून, नेरूळ पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आकाश रामदास नवले असे २५ वर्षीय आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १ लाख ९६ हजार रुपये किमतीच्या ५ मोटारसायकल आणि २ मोबाईल फोन असा एकूण ७ गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तो व्यवसायाने डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा, मात्र या कामाच्या आड त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपी हा मूळचा जुन्नर येथील रहिवासी असून सध्या नेरूळ आणि सीवूड्स परिसरात वास्तव्य करत होता.

शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे कडक आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश ठाकरे, तुषार बच्छाव आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून नवले याला अटक केली. या कारवाईमुळे नेरूळ पोलीस ठाण्यातील ५, सानपाडा येथील १ आणि सीबीडी बेलापूरमधील १ असे एकूण ७ गुन्हे उघड झाले आहेत. आरोपी चोरलेल्या दुचाकीचा वापर रॅपिडो बाईक टॅक्सी म्हणून करत असे. विशेष म्हणजे, जोपर्यंत दुचाकीत पेट्रोल असायचे तोपर्यंतच तो ती वापरायचा आणि पेट्रोल संपल्यावर गाडी तिथेच सोडून पसार व्हायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन