Navi Mumbai : मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या; तुर्भे पोलिसांनी दोघांना केली अटक प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

Navi Mumbai : मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाची हत्या; तुर्भे पोलिसांनी दोघांना केली अटक

तुर्भे परिसरात मोबाईल चोरीच्या केवळ संशयावरून दोन व्यक्तींनी एकाच परिसरातील तरुणावर बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव सुधाकर पाटोळे असून, तुर्भे पोलिसांनी संशयित अर्जुन अडागळे आणि विधान मंडळ या दोघांना अटक केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : तुर्भे परिसरात मोबाईल चोरीच्या केवळ संशयावरून दोन व्यक्तींनी एकाच परिसरातील तरुणावर बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव सुधाकर पाटोळे असून, तुर्भे पोलिसांनी संशयित अर्जुन अडागळे आणि विधान मंडळ या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेनुसार, सहा नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास तिघेही नवजीवन विद्यालयाजवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ भेटले. यावेळी अडागळे याचा मोबाईल हरवला. परिसरात शोधूनही मोबाईल न सापडल्याने तो मोबाईल सुधाकर पाटोळे यांनी घेतल्याचा संशय अडागळेला आला. विचारणा करताच वादावादी झाली आणि दोघा संशयितांनी शिवीगाळ करत त्याला धमकावले.

वाद वाढताच अडागळे आणि मंडल यांनी रागाच्या भरात जवळच पडलेले बांबू आणि पाइप उचलून सुधाकरवर बेदम मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला.

आरोपी दोघेही त्याला तिथेच सोडून पळून गेले. माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुधाकरला तातडीने वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून हा सर्व प्रकार मोबाईल चोरीच्या संशयातून झाल्याचे सांगितले.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर