एनएमएमटी कंडक्टरला प्रवाशांनी दिला हृद्य निरोप 
नवी मुंबई

Navi Mumbai : एनएमएमटी कंडक्टरला प्रवाशांनी दिला हृद्य निरोप

कंडक्टर हरिदास मनोहर गायकवाड यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी प्रवाशांनी बसमध्येच समारंभपूर्वक त्यांचा निरोप घेतला.

Swapnil S

टीपीजी कृष्णन/ नवी मुंबई

नवी मुंबई महानगर परिवहन (NMMT) च्या नेरळ-उलवे-वर्ल्ड ट्रेड सेंटरदरम्यान धावणाऱ्या ११६ क्रमांकाच्या मार्गावरील नियमित प्रवाशांनी गुरुवारी एका हृदयस्पर्शी प्रसंगाचा अनुभव घेतला. कंडक्टर हरिदास मनोहर गायकवाड यांच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी प्रवाशांनी बसमध्येच समारंभपूर्वक त्यांचा निरोप घेतला. त्यामुळे या मार्गावरील सर्वसाधारण बसयात्रासुद्धा प्रवासी आणि कंडक्टर दोघांसाठीही अविस्मरणीय ठरली.

एनएमएमटी कंडक्टरला प्रवाशांनी दिला हृद्य निरोप

विशेष म्हणजे, गायकवाड यांनी याच दिवशी आपला वाढदिवस साजरा केला. या सुंदर योगायोगामुळे निरोप समारंभाला भावभावनांचे अधिक रंग चढले. प्रवाशांनी बसमध्येच केक कापून आनंद द्विगुणित केला. या आनंदसोहळ्यात बस हशा, टाळ्या आणि शुभेच्छांच्या गजरात न्हाऊन निघाली. आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या सेवेला योग्य मान मिळाल्याचा समाधानाचा भाव गायकवाड यांच्या पाणावलेल्या डोळ्यातून प्रकर्षाने जाणवत होता. त्यांनीही सर्व प्रवाशांचे मनःपूर्वक आभार मानले.

एनएमएमटी कंडक्टरला प्रवाशांनी दिला हृद्य निरोप

नियमित प्रवाशांसाठी हा क्षण त्यांच्या दैनंदिन सेवेत नेहमी आदराने, मनमिळावूपणे आणि कर्तव्यनिष्ठेने वागणाऱ्या कंडक्टरशी जुळलेल्या नात्याचे प्रतीक होता, तर गायकवाड यांच्यासाठी हा त्यांच्या २९ वर्षांच्या NMMT सेवेतून निवृत्तीच्या प्रवासाला सुरुवात करणारा एक भावूक टप्पा ठरला. ५८ वर्षे पूर्ण करून ते ३० नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे सेवानिवृत्त होणार आहेत.

एनएमएमटी कंडक्टरला प्रवाशांनी दिला हृद्य निरोप

आपल्या पुढील आयुष्याविषयी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की ते पुण्याजवळील आपल्या मूळगावी परत जाऊन निवृत्त जीवन शांततेत व्यतीत करणार आहेत. अनेक प्रवाशांनी नव्या इनिंगसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत निरोप दिला.

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब