नवी मुंबई

१२ जानेवारीपासून भिवंडीत ‘विकास भारत संकल्प यात्रा’

Swapnil S

भिवंडी : केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'विकास भारत संकल्प यात्रा' शुक्रवार, १२ जानेवारीपासून भिवंडीतील मिल्लतनगर येथील फरहान हॉल येथून सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. ही यात्रा सलग १४ दिवस म्हणजेच २५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, शहरात २८ ठिकाणी विविध शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ज्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वावलंबी निधीचा समावेश आहे. यासह पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान ई-बस सेवा, अमृत योजना आदी योजनांचा समावेश आहे.तसेच भारत संकल्प यात्रा अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारी व्हॅन शहरात ठिकठिकाणी फिरणार आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त