क्रीडा

मुंबईकडून बिहारचा धुव्वा: एक डाव आणि ५१ धावांनी विजय; दुबेची अष्टपैलू चमक

पाटणा येथील मोईन उल हक स्टेडियममध्ये झालेल्या ब-गटातील या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात २५१ धावा केल्या

Swapnil S

पाटणा : शिवम दुबेने (४१ धावा आणि ६ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बिहारचा एक डाव आणि ५१ धावांनी फडशा पाडून विजयी सलामी नोंदवली.

पाटणा येथील मोईन उल हक स्टेडियममध्ये झालेल्या ब-गटातील या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात २५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात बिहारचा पहिला डाव १०० धावांत आटोपल्यावर मुंबईने फॉलोऑन लादला. मात्र दुबेने चार, तर रॉयस्टन डायसने हॅट्‌ट्रिकसह तीन बळी पटकावल्याने बिहारचा दुसरा डावसुद्धा सोमवारी ३५.१ षटकांत १०० धावांतच आटोपला. शर्मन निगरोधने त्यांच्यासाठी सर्वाधिक ४० धावा केल्या. मुंबईला डावाने विजय मिळवल्याने बोनस गुणासह एकूण ७ गुण मिळाले. आता त्यांची १२ जानेवारीपासून आंध्र प्रदेशशी गाठ पडेल.

विदर्भाच्या विजयात आदित्य ठाकरे चमकला

मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरेने (४४ धावांत ४ बळी) दुसऱ्या डावातही केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर विदर्भाने अ-गटातील सामन्यात सेनादलचा ७ गडी राखून पराभव केला. सेनादलचा दुसरा डाव १५५ धावांत गुंडाळल्यावर विदर्भाने १७८ धावांचे लक्ष्य ५६.३ षटकांत गाठले. संजय रघुनाथने ९ चौकारांसह नाबाद ८४, तर करुण नायरने ३६ धावांचे योगदान दिले. तसेच महाराष्ट्राने पहिल्या सामन्यात मणिपूरचा एक डाव व ६९ धावांनी धुव्वा उडवला.

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता

परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातील ST डेपो दुर्लक्षित; १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन, शिवसेना उबाठा आक्रमक

Mumbai : वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा अहवाल द्या; राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

साताऱ्यातील कण्हेर धरणावरील हेल्पर ते केनियातील कृषी सम्राट; कष्ट आणि जागतिक यशाची भावस्पर्शी प्रेरणागाथा