क्रीडा

टी-२० सामन्यात भारतीय महिला संघ आघाडीवर, जेमिमामुळे विजय शक्य

कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली

वृत्तसंस्था

मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (२७ चेंडूंत नाबाद ३६ धावा) दडपणाखाली साकारलेली दमदार खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने गुरुवारी पहिल्या टी-२० लढतीत श्रीलंकेवर ३४ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

दाम्बुला येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या १३९ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकांत ५ बाद १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु डावखुरा फिरकीपटू राधा यादव (२/२२) आणि अन्य गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी, स्मृती मानधना (१), शाबिनी मेघना (०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२२) यांनी निराशा केल्यावर शफाली वर्मा (३१) आणि जेमिमा यांच्या योगदानामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. दीप्ती शर्मानेसुद्धा ८ चेंडूंत १७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

Mumbai : डिसेंबरपर्यंत ग्रीन बाँड बाजारात; मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी BMC चा निर्णय