क्रीडा

टी-२० सामन्यात भारतीय महिला संघ आघाडीवर, जेमिमामुळे विजय शक्य

कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली

वृत्तसंस्था

मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (२७ चेंडूंत नाबाद ३६ धावा) दडपणाखाली साकारलेली दमदार खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने गुरुवारी पहिल्या टी-२० लढतीत श्रीलंकेवर ३४ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

दाम्बुला येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या १३९ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकांत ५ बाद १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु डावखुरा फिरकीपटू राधा यादव (२/२२) आणि अन्य गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी, स्मृती मानधना (१), शाबिनी मेघना (०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२२) यांनी निराशा केल्यावर शफाली वर्मा (३१) आणि जेमिमा यांच्या योगदानामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. दीप्ती शर्मानेसुद्धा ८ चेंडूंत १७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश