क्रीडा

टी-२० सामन्यात भारतीय महिला संघ आघाडीवर, जेमिमामुळे विजय शक्य

कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली

वृत्तसंस्था

मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (२७ चेंडूंत नाबाद ३६ धावा) दडपणाखाली साकारलेली दमदार खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने गुरुवारी पहिल्या टी-२० लढतीत श्रीलंकेवर ३४ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

दाम्बुला येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या १३९ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकांत ५ बाद १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु डावखुरा फिरकीपटू राधा यादव (२/२२) आणि अन्य गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी, स्मृती मानधना (१), शाबिनी मेघना (०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२२) यांनी निराशा केल्यावर शफाली वर्मा (३१) आणि जेमिमा यांच्या योगदानामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. दीप्ती शर्मानेसुद्धा ८ चेंडूंत १७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती