क्रीडा

टी-२० सामन्यात भारतीय महिला संघ आघाडीवर, जेमिमामुळे विजय शक्य

वृत्तसंस्था

मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (२७ चेंडूंत नाबाद ३६ धावा) दडपणाखाली साकारलेली दमदार खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने गुरुवारी पहिल्या टी-२० लढतीत श्रीलंकेवर ३४ धावांनी मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

दाम्बुला येथे झालेल्या या सामन्यात भारताने दिलेल्या १३९ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला २० षटकांत ५ बाद १०४ धावांपर्यंतच मजल मारता आली. कविशा दिलहारीने नाबाद ४७ धावा फटकावताना अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु डावखुरा फिरकीपटू राधा यादव (२/२२) आणि अन्य गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेला पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी, स्मृती मानधना (१), शाबिनी मेघना (०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२२) यांनी निराशा केल्यावर शफाली वर्मा (३१) आणि जेमिमा यांच्या योगदानामुळे भारताने २० षटकांत ६ बाद १३८ धावा केल्या. दीप्ती शर्मानेसुद्धा ८ चेंडूंत १७ धावांचे बहुमूल्य योगदान दिले.

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!