क्रीडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केला राष्ट्रकुलमधील कामगिरीचा गौरव

वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने केलेल्या दमदार कामगिरीचा गौरव केला. यावेळी त्यांनी नागरिकांना खेळांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारताने क्रीडा विश्वात केलेली चमकदार कामगिरी भारताच्या गुणवत्तेची झळाळी दाखविते. अशा प्रकारच्या गुणवत्तेला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.” भारताने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२मध्ये पदकतालिकेत चौथे स्थान मिळविले. भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदके अशी एकूण ६१ पदके पटकाविली.

मोदी पुढे म्हणाले की, “मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या दृढ निश्चयापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. मी देशातील युवकांना पुढील २५ वर्षे देशाच्या विकासासाठी समर्पित करण्याचे आवाहन करत आहे. आपण संपूर्ण मानवजातीच्या विकासासाठी काम केलं पाहिजे.”

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग