क्रीडा

फजल, तिवारी यांची क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती

मुंबईने त्याला हंगाम संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली आहे. सौरभने झारखंडचे अखेरच्या साखळी सामन्यात यशस्वी नेतृत्व करताना राजस्थानला नमवले.

Swapnil S

विदर्भाचा अनुभवी सलामीवीर फैझ फझल, बंगालचा कर्णधार मनोज तिवारी, मुंबईचा मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी यांनी या रणजी हंगामातील अखेरच्या साखळी सामन्याद्वारे क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्याशिवाय झारखंडच्या सौरभ तिवारीनेसुद्धा काही दिवसांपूर्वी निवृत्ती जाहीर केली होती. आयपीएल तसेच भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता फारच धूसर असल्याने तसेच युवा खेळाडूंना संधी देण्याच्या कारणाने या खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे, हे स्पष्ट आहे. मनोजच्या बंगालने अखेरच्या सामन्यात बिहारला डावाने धूळ चारली. मात्र तरीही ते ब-गटातून आगेकूच करू शकले नाहीत. फैझच्या विदर्भ संघाने मात्र उपांत्यपूर्व फेरी गाठली असली, तरी तो त्या सामन्यात खेळणार नाही. तसेच धवलचा समावेश असलेल्या मुंबई संघानेही आगेकूच केली आहे. मुंबईने त्याला हंगाम संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली आहे. सौरभने झारखंडचे अखेरच्या साखळी सामन्यात यशस्वी नेतृत्व करताना राजस्थानला नमवले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत