क्रीडा

दुसऱ्या कसोटीत श्रीलंका विजयी; मालिका बरोबरीची

वृत्तसंस्था

प्रभात जयसूर्या (५/११७) आणि रमेश मेंडिस (४/१०१) या डाव्या-उजव्या फिरकीपटूंच्या जोडीने दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत २४६ धावांनी धूळ चारली. श्रीलंकेच्या विजयामुळे उभय संघांतील दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

अखेरच्या दिवशी ५०८ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने १ बाद ८९ धावांवरून पुढे सुरुवात केली. परंतु त्यांचा दुसरा डाव २६१ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार बाबर आझम (८१) आणि इमाद उल हक (४९) यांनी पाकिस्तानचा पराभव टाळण्यासाठी कडवा संघर्ष केला; परंतु जयसूर्या-मेंडिस जोडीपुढे त्यांनाही हार मानावी लागली. शतकासह दोन्ही डावांत मिळून १४२ धावा करणारा धनंजया डीसिल्व्हा सामनावीर, तर तीन लढतींमध्ये सर्वाधिक १७ बळी मिळवणारा जयसूर्या मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उभय संघांतील पहिली कसोटी पाकिस्तानने चार गडी राखून जिंकली होती.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

४ जूनला ठरणार खरी शिवसेना कोणाची? मतदारराजाचा कौल निर्णायक; मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना आमनेसामने

कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू