संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

Ind vs NZ, ICC T20 WC26 Final : भारताने सांघिक कामगिरीवर भर द्यावा; अंतिम फेरीसाठी सुनील गावस्कर यांचा सल्ला

भारताने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये एखाददुसऱ्या खेळाडूवर अवलंबून न राहता, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला.

Swapnil S

मुंबई : भारताने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये एखाददुसऱ्या खेळाडूवर अवलंबून न राहता, मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला. त्याचप्रमाणे आता अंतिम फेरीतही भारताने सांघिक कामगिरीवरच भर द्यावा, असा मोलाचा सल्ला भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी दिला आहे.

गावस्कर यांच्या 'चॅम्प्स फाऊंडेशनसाठी' आयोजित एका सेलिब्रिटी गोल्फ स्पर्धेत लिटिल मास्टर सुनील गावस्कर म्हणाले की, "इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताने निसटता विजय मिळवला. माझ्या मते, अंतिम फेरीचा सामना थरारक होणार आहे. न्यूझीलंडने अभूतपूर्व क्रिकेटचे प्रदर्शन केले आहे. भारतीय संघानेही दोन ते तीन सामन्यांत अखेरच्या क्षणी दमदार खेळ करत विजय मिळवला आहे. भारतासाठी ही जमेची बाजू म्हणता येईल."

"भारताने संपूर्ण स्पर्धेत एकाच - खेळाडूवर अवलंबून न राहता, सांघिक कामगिरीनुसार यश संपादन केले आहे. गेल्या दोन-तीन सामन्यांत संजू सॅमसनला दिलेली संधी भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे," असेही गावस्कर म्हणाले.

Instamart वरून आता एलपीजी सिलिंडरची होम डिलिव्हरी; स्विगीची HPCL सोबत भागीदारी, कनेक्शनशिवाय करता येणार ऑर्डर

Video : नोएडात ई-बाईक चार्जिंगवेळी भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, ५० कुटुंबांची सुटका

Mumbai : एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉल लागू

माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क

Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; ओशिवरा पोलीस ठाण्याच्या शेजारीच थरार