Twitter
क्रीडा

वंडरसेसमोर टीम इंडिया निष्प्रभ; दुसऱ्या वनडेत भारताचा ३२ धावांनी पराभव

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली.

Swapnil S

कोलंबो : जेफ्री वंडरसेच्या फिरकीसमोर रोहित शर्मा वगळता भारताचे अन्य फलंदाज निष्प्रभ ठरले, त्यामुळे एक वेळ मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अक्षर पटेलने थोडा फार प्रतिकार केला, परंतु विजयासाठी तो अपुरा ठरला. चांगली सुरुवात करूनही भारताने हा सामना ३२ धावांनी गमावला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पराभवामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने १-० अशी आघाडी घेतली.

श्रीलंकेने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ४२.२ षटकांत सर्वबाद २०८ धावाच करता आल्या. कर्णधार रोहित शर्माने फटकेबाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढले. त्याला शुभमन गिलने संयमी साथ दिली. सलामीवीरांनी ९७ धावांची भागीदारी रचत छान सुरुवात केल्याने भारताने सामन्यावर पकड मिळवली होती. सलामीची ही जोडी शतकाच्या उंबरठ्यावर असताना रोहित शर्माला फटक्यांचा मोह अनावर झाला. वंडरसेच्या गोलंदाजीवर रोहित आपली विकेट गमावून बसला. त्याने ४४ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीला जी गळती लागली ती शेवटपर्यंत रोखून धरण्यात भारतीय फलंदाजांना अपयश आले. अक्षर पटेलने एकाकी झुंज दिली. परंतु त्याची ४४ धावांची खेळी विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. श्रीलंकेकडून वंडरसेने सहा बळी मिळवले.

तत्पूर्वी, अविष्का फर्नांडो (४० धावा) आणि कामिंडू मेंडिस (४०) आणि दुनिथ वेलालागे (३९) यांच्यामुळे श्रीलंकेने ५० षटकांत ९ बाद २४० धावा केल्या होत्या. भारताकडून वॉशिंग्टनने ३, तर कुलदीपने २ फलंदाजांना माघारी धाडले.

UPI वरील शुल्काचा भार व्यापाऱ्यांवर नको; दिल्लीतील व्यापाऱ्यांना धास्ती, पुन्हा रोखीकडे वळण्याचा निर्णय

१५ वर्षे पूर्ण झालेली मुस्लिम मुलगा-मुलगी लग्नासाठी सक्षम; पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय

शाहझाद भट्टी टोळी दहशतवादी संघटना घोषित; गृह मंत्रालयाकडून UAPA कायद्यांतर्गत बंदी, देशभरातून २०० जणांना अटक

तृतीयपंथीयांना घर नाकारले तर कारवाई; राज्य सरकारचा इशारा

Mumbai : दोन हजार कोटी खर्चुन हॉटेल, पार्किंग हब, शॉपिंग मॉल; मानखुर्द जकात नाक्यावर ३० मजली इमारत