@ICC
क्रीडा

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाचा १० विकेट्सने विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल १० विकेट्सने विजय मिळवला

प्रतिनिधी

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर ११८ धावांचे आव्हान ठेवले होते. असे असताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी धडाकेबाज फलंदाजी करत हे लक्ष अवघ्या ११ षटकांमध्ये पार केले. यावेळी मार्शने 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर त्याला ट्रॅव्हिसनेही अर्धशतकी खेळी करून चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता दुसरा सामना १० विकेट्सने जिंकला. याचसोबत आता १ - १ अशी मालिकेत बरोबरी केली आहे.

आज ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना हा विशाखापट्टणम येथे झाला. यावेळी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. संपूर्ण संघ हा अवघ्या ११७ धावांमध्ये सर्वबाद झाला. यावेळी एकाही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या, तर अक्षर पटेलने त्यांनंतर २९ धाव केल्या. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कने ५ विकेट्स घेत अर्धा संघ तंबूत पाठवला.

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

मुंबईत लवकरच पॉड टॅक्सी सेवा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले निर्देश; कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसराचा करणार विकास

ठाणे मेट्रो-४च्या चाचणीला प्रारंभ

मतदार केंद्रांवर एजंट नियुक्त करा; निवडणूक आयोगाचे राजकीय पक्षांना पत्र

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या; माहिती अधिकारातून आकडे समोर