क्रीडा

ट्रिसा-गायत्रीचे पॅकअप! उपांत्य फेरीत चीनच्या जोडीकडून पराभूत

भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या बिगरमानांकित जोडीची जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील विजयी घोडदौड अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आली.

Swapnil S

नवी दिल्ली: भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या बिगरमानांकित जोडीची जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील विजयी घोडदौड अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आली. शनिवारी झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चीनच्या लियू शेंग शु आणि तन निंग या जोडीकडून १ तास ११ मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात २१-१८, १३-२१, ८-२१ असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय जोडीला पहिल्यावहिल्या कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

यापूर्वी भारताने २०११ मध्ये लंडन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते. तेव्हा ज्वाला गुत्ता आणि अश्विनी पोनप्पा यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर भारताला या प्रकारात पदक मिळवण्यात यश आले आहे. चिनी जोडीविरुद्धचा इतिहास पाहता भारतीय जोडीचा रेकॉर्ड अनुकूल नव्हता. यापूर्वी झालेल्या ७ सामन्यांपैकी ६ सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.

पहिल्या गेममध्ये ट्रिसा आणि गायत्रीने आक्रमक सुरुवात करत ७-२ अशी आघाडी घेतली होती. मात्र, चिनी खेळाडूंनी सलग ६ गुण घेत पुनरागमन केले आणि मध्यंतराला ११-७ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ३१ रॅलींच्या शानदार खेळासह भारतीय जोडीने १२-१२ अशी बरोबरी साधली. ट्रिसाने मारलेल्या क्रॉस-कोर्ट विनर्स आणि जंप स्मॅशच्या जोरावर भारताने १९-१८ अशी आघाडी मिळवली आणि पहिला गेम २१-१८ असा खिशात घातला.

दुसऱ्या गेममध्ये चिनी जोडीने जोरदार पुनरागमन करत १२-११ नंतर सलग गुण मिळवले आणि ४९ रॅलींच्या संघर्षानंतर हा गेम २१-१३ असा जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये चिनी खेळाडूंनी अतिशय वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. ५६ रॅलींच्या दीर्घ लढतीनंतर भारतीय जोडीने २-२ अशी बरोबरी केली होती; परंतु त्यानंतर चिनी जोडीने भारतीय खेळाडूंच्या चुकांचा फायदा घेत ११-५ अशी भक्कम आघाडी घेतली. अखेर चिनी जोडीने तिसरा गेम २१-८ असा जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

JNPT येथून पहिली 'डबल-स्टॅक लाँग-हॉल' कंटेनर ट्रेन धावली; ३६० टीईयू माल घेऊन ४२२ किमीचा प्रवास वेळ वाचणार; पोर्टवरील गर्दी कमी होणार

Mumbai : महापौर बंगल्यात काय बदल केला? ठाकरे सेना, काँग्रेस करणार पाहणी

आता कांदाही रडवणार; कांदा दरातील तेजी दोन महिने कायम राहण्याचा अंदाज

Mumbai : महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांची केशव सृष्टीतील शैक्षणिक सहल वादात